शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

“राम मंदिर सर्व हिंदूंचे, पण भाजपा धर्माचे राजकारण करतेय”; रेवंथ रेड्डींची दावोसमधून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:20 IST

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराचा भाजपावाल्यांशी काही संबंध नाही. ते केवळ धार्मिक राजकारण करत आहेत, अशी टीका तेलंगणचे नवे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली आहे.

Ram Mandir Ayodhya: २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा अवघे काही दिवस राहिले असताना, राजकीय वातावरण अधिकच तापत आहे. यातच तेलंगणचे नवे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मत मांडताना भाजपावर टीका केली आहे. राम मंदिर हे सर्व हिंदूंचे आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी धर्माचे राजकारण करत आहे, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली. 

दावोस येथे एका मुलाखतीत बोलताना रेवंथ रेड्डी म्हणाले की, तेलंगणातील भद्राचलम येथील राम मंदिरात अनेकदा गेलो आहे. मला अयोध्या आणि भद्राचलम राम मंदिरात फरक दिसत नाही. राम मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम झाल्यानंतर अयोध्येला जाईन, असे रेड्डी यांनी सांगितले. तसेच राम मंदिर हे सर्व हिंदूंचे आहे. याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना राजकीयदृष्ट्या कसा फायदा होईल, अशी विचारणा रेड्डी यांनी केली. राम मंदिराचा फायदा होईल, असा दावा भाजपावाले करत असतील, तर ते धार्मिक राजकारण करत आहेत, असे रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले.

हा पहिला किंवा शेवटचा दिवस नाही

राम मंदिराचे काम अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा केली जात असल्याबाबत शंकाचार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना रेड्डी म्हणाले की, चारही शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण असल्याने अयोध्येला जाणार नसल्याचे सांगितले होते. पण ज्याचा अशा गोष्टींवर विश्वास आहे तो जाऊ शकतो, हा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस नाही, असे रेड्डी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. यावर रेवंथ रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेची जनता आतुरतेने वाट पाहत होती. या उपक्रमामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवीन ऊर्जा निर्माण होईल. इंडिया आघाडी देशासाठी उत्तम काम करू शकते, असे सांगताना लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील १४ ते १७ जागा काँग्रेस जिंकू शकेल. निवडणुकीतील थेट लढत बीआरएस पक्षासोबत असेल, भाजपासोबत नाही, असे रेवंथ रेड्डी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTelanganaतेलंगणा