शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

“राम मंदिर सर्व हिंदूंचे, पण भाजपा धर्माचे राजकारण करतेय”; रेवंथ रेड्डींची दावोसमधून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:20 IST

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराचा भाजपावाल्यांशी काही संबंध नाही. ते केवळ धार्मिक राजकारण करत आहेत, अशी टीका तेलंगणचे नवे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली आहे.

Ram Mandir Ayodhya: २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा अवघे काही दिवस राहिले असताना, राजकीय वातावरण अधिकच तापत आहे. यातच तेलंगणचे नवे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मत मांडताना भाजपावर टीका केली आहे. राम मंदिर हे सर्व हिंदूंचे आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी धर्माचे राजकारण करत आहे, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली. 

दावोस येथे एका मुलाखतीत बोलताना रेवंथ रेड्डी म्हणाले की, तेलंगणातील भद्राचलम येथील राम मंदिरात अनेकदा गेलो आहे. मला अयोध्या आणि भद्राचलम राम मंदिरात फरक दिसत नाही. राम मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम झाल्यानंतर अयोध्येला जाईन, असे रेड्डी यांनी सांगितले. तसेच राम मंदिर हे सर्व हिंदूंचे आहे. याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना राजकीयदृष्ट्या कसा फायदा होईल, अशी विचारणा रेड्डी यांनी केली. राम मंदिराचा फायदा होईल, असा दावा भाजपावाले करत असतील, तर ते धार्मिक राजकारण करत आहेत, असे रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले.

हा पहिला किंवा शेवटचा दिवस नाही

राम मंदिराचे काम अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा केली जात असल्याबाबत शंकाचार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना रेड्डी म्हणाले की, चारही शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण असल्याने अयोध्येला जाणार नसल्याचे सांगितले होते. पण ज्याचा अशा गोष्टींवर विश्वास आहे तो जाऊ शकतो, हा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस नाही, असे रेड्डी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. यावर रेवंथ रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेची जनता आतुरतेने वाट पाहत होती. या उपक्रमामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवीन ऊर्जा निर्माण होईल. इंडिया आघाडी देशासाठी उत्तम काम करू शकते, असे सांगताना लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील १४ ते १७ जागा काँग्रेस जिंकू शकेल. निवडणुकीतील थेट लढत बीआरएस पक्षासोबत असेल, भाजपासोबत नाही, असे रेवंथ रेड्डी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTelanganaतेलंगणा