शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे योग्यच’, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 13:13 IST

Indian Air Strike: चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत.

हैदराबाद - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आत्मघातकी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या जवानांना आज आदरांजली वाहिली जात आहे. मात्र त्याचदिवशी पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राईकवरून राजकारणाला तोंड फुटले आहे. आता तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये चुकीचे काय आहे. केंद्र सरकारपर्यंत माझं म्हणणं पोहोचवा, असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांचे वक्तव्य हे बेजबाबदार असून, त्यांनी हुतात्मा जवानांचा अपमान केला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते रशिद अल्वी यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात चुकीचे काय आहे, असे म्हटले आहे. जर आमच्याकडे पुरावे आहेत, व्हिडीओ आहेत म्हणून सरकार सांगत असेल, तर ते दाखवण्यात काय चुकीचे आहे, असा प्रश्न राशिद अल्वी यांनी विचारला आहे.

१४ फेब्रुवारी २०१४ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर काश्मीरमध्येही व्यापक मोहीम हातात घेत दहशतवाद्यांचे काश्मिरमधील नेटवर्क उद्ध्वस्त केले होते. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलRahul Gandhiराहुल गांधी