शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बापमाणूस! नवजात बाळाच्या आईचा मृत्यू, मिळालं नाही दूध; वडिलांनी केली 10 किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:38 IST

बाळाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर बाळाला दूध पाजणं हे वडिलांसाठी आव्हान बनले.

तेलंगणातील आदिलाबादमध्ये नवजात बाळाला पाजण्यासाठी एका कुटुंबाकडे दूध नसल्याची घटना समोर आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर बाळाला दूध पाजणं हे वडिलांसाठी आव्हान बनले. या वडिलांना दूध आणण्यासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागली. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारचे मंत्री टी. हरीश राव यांनी तातडीने एक्शन घेत मदत केली. मंत्र्यांनी कुटुंबासाठी गायीची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले जेणेकरुन कुटुंबाला बाळाची योग्य काळजी घेता येईल. नुकतीच घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, लोकांनी बाळाचा जीव वाचवण्यासाठी वेळेवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंत्र्यांचे कौतुक केले. जंगबाबू आणि कोडापा पारूबाई हे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रावेली मंडलातील राजुगुडा या दुर्गम गावातील रहिवासी आहेत. 

इंद्रावेली येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात पारूबाई यांनी जानेवारी महिन्यात एका मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पारूबाई आणि बाळाला त्यांच्या मूळ गावी आणले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पारूबाई यांचा 10 दिवसांनी मृत्यू झाला. ज्या दुर्गम खेडेगावात हे कुटुंब नवजात मुलीसह राहत आहे, तेथे शेळी, गाय अशी दुभती जनावरे उपलब्ध नव्हती.

गावात दुधाची पाकिटे उपलब्ध नसल्यामुळे वडिलांना दररोज 10 किलोमीटर पायी चालत जावे लागायचे. यानंतर ही बाब अर्थमंत्री हरीश राव यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या सूचनेवरून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला पाहायला जाऊन दुधाची पाकिटे व पौष्टिक अन्नाची पाकिटे कुटुंबीयांना दिली. त्यांनी मुलाच्या प्रकृतीची माहिती घेतली. मुलाचे वडील जंगबाबू यांच्या इच्छेनुसार या कर्मचार्‍यांनी एक गाय खरेदी करून ती गाय नातेवाईकांच्या स्वाधीन करत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"