शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

लोकसभेतील पराभवानंतर तेजस्वी यादवांचे पुनरागमन; 'यामुळे' होते राजकारणापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 13:56 IST

चमकी तापीमुळे बिहारमध्ये शेकडो मुलांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी तेजस्वी यादव कुठं आहे, असे सवाल उपस्थित झाले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गायब झालेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुनरगामन केले आहे. ट्विट करून तेजस्वी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून दूर राहण्याचे कारण सांगितले. बिहारमध्ये काँग्रेस-आरजेडीला दारुण पराभव पत्करावा लागला होता.

तेजस्वी यादव ट्विटमध्ये म्हणाले की, मित्रांनो लिगामेंट आणि एसीएल दुखापतीमुळे मी गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होतो. त्यावर उपचार घेण्यात आपण व्यस्त होतो. परंतु, माझ्या राजकीय विरोधकांचे आणि मीडियातील एका गटाच्या माझ्याविषयीच्या गंमतीदार स्टोरींचा मी आनंद घेत होतो, असंही तेजस्वी म्हणाले. या संदर्भात तेजस्वी यांनी सलग चार ट्विट केले.

तेजस्वी पुढे म्हणाले की, आमची जबाबदारी त्या लोकांविषयी आहे, जे आम्हाला समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायासाठी पर्याय समजतात. मी सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही इथंच आहोत. लढा कायम सुरू राहणार आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर चिंतन आणि विश्लेषण करण्यासाठी मला मदत मिळाल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.

चमकी तापीमुळे बिहारमध्ये शेकडो मुलांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी तेजस्वी यादव कुठं आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. परंतु, आरजेडीच्या पदाधिकाऱ्यांना त्याचवेळी पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच संसदेत हा प्रश्न उठविण्यास सांगितले होते, असंही तेजस्वी म्हणाले.