शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्येही महिलांसाठी योजना; सत्तेत आल्यास दरमहा २५०० रुपये देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:37 IST

Tejashwi Yadav : सत्तेत आल्यास माई बहन मान योजनेंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. यानंतर आता देशातील विविध राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'माई बहन मान योजना' जाहीर केली आहे. सत्तेत आल्यास माई बहन मान योजनेंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी मतदारांसाठी घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी बिहारमधील ग्राहकांना '२०० युनिट मोफत वीज' देण्याचे आश्वासन दिले होते. दरभंगा येथील कार्यक्रमात महिलांसाठीच्या योजनेची घोषणा करताना तेजस्वी यादव म्हणाले, "राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही माई बहन मान योजना' सुरू करू. माई बहन मान योजनेअंतर्गत आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल माता-भगिनींना आर्थिक मदत देऊ. सरकार स्थापन होताच महिनाभरात ही योजना सुरू करू."

पुढे तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही सतत दौरे करत आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून सर्व माहिती घेत आहोत. लोक बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहेत. सरकारच्या उणिवा उघड करण्याचे काम आम्ही केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. उपमुख्यमंत्री असताना मी पाच लाख लोकांना नोकऱ्या दिल्या. आता बऱ्याच लोकांना सन्मान द्यावा लागेल आणि सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायही करू.

याचबरोबर, आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करू, आम्हाला संधी द्या. आम्ही रात्रभर फिरून यंत्रणेत सुधारणा केली. आजचा नीती आयोगाचा अहवाल बघा, आजही बिहार स्थलांतरात पहिल्या क्रमांकावर आहे. बेरोजगारीत नंबर वन आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत आणि आमच्याकडे एक दृष्टी आहे, एक रोड मॅप आहे. आम्ही बिहारमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक आणली होती. तसेच, आम्ही मिथिलांचल आणि सीमांचलसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करू जेणेकरून या भागाचा विकास करता येईल, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार