शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

ऐन सणासुदीच्या काळात कांदा आणणार ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:44 IST

खरीपाला उशीर : टंचाई निर्माण झाल्यामुळे होणार भाववाढ

ठळक मुद्देप्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मानक संस्था क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, खरीप हंगामास झालेला उशीर आणि इतर काही कारणांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, देशातील कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस पडला. अनेक ठिकाणी पाऊस पडलाच नाही. यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवा कांदा बाजारात यायलाही उशीर होईल. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात.

प्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळानेही कांद्याचे नुकसान केले आहे. इतरही काही कारणांमुळे कांदा महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. क्रिसिलने म्हटले की, ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणात ९ टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याच्या उत्पादनात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तथापि, ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे उत्पादन बाजारात येईल. त्या आधीच कांद्याच्या दरात वाढ होईल.

२०१८ च्या तुलनेत दर होतील दुप्पट २०१८ च्या तुलनेत यंदा कांद्याचे दर १०० टक्क्यांनी (दुप्पट) वाढू शकतात. यंदा खरीप हंगामात कांद्याची घाऊक किंमत ३० रुपयांच्या पुढे जाऊ शकते. गेल्या वर्षी हा दर थोडा कमी होता. २०१८ हे कांद्याच्या दरांसाठी सामान्य वर्ष मानले जाते. यानंतर कांद्याचा दरात सतत वृद्धी होत आहे. २०२० मध्ये देखील कांद्याचे दर २०१८ च्या तुलनेत दुप्पट झाले होते.

टॅग्स :onionकांदा