शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 19:07 IST

अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे.

नवी दिल्ली- अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दुस-या दिवशी म्हणजे काल हार्दिक अण्णांच्या भेटीसाठी गेला होता. परंतु अण्णांनी त्याला व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. त्यानंतर अपमानित झालेल्या हार्दिकनं अण्णांवरच आता गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. चांगल्या कामासाठी मी समर्थन देतो. अण्णांच्या आंदोलनाबाबत कधी त्यांच्याशी बोललो नाही. त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करण्यासाठी 'बेस्ट ऑफ लक', असं हार्दिक म्हणाला आहे. यावेळी हार्दिक पटेलनं अण्णांवर आरोपांचा भडिमार केला आहे. केजरीवालांना भेटीसाठी त्यांनी राजीनामा देऊनच मला भेटायला यावं, असं अण्णा म्हणत आहेत. केजरीवालांसाठी एवढी जाचक अट का ठेवली आहे ?,' असा सवालही हार्दिकनं उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात शेतकरी 200 किलोमीटर चालत विधानभवनावर धडकले, तेव्हा अण्णा कुठे होते? मध्य प्रदेशातील मनसरमध्ये दहा शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तेव्हा अण्णा कुठे होते? आम्ही सतत शेतकऱ्यांची आंदोलने छेडली, तेव्हा अण्णा कुठे होते?, असे प्रश्न उपस्थित करतानाच आताच अण्णांना शेतकरी का आठवले?, असं म्हणत हार्दिकनं अण्णांवर टीकेची झोड उठवली आहे. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेल