शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

करदाते राष्ट्र निर्माते, त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात -वित्तमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:49 IST

करदात्यांच्या हक्काची सनद लवकरच जाहीर करणार; करदात्यांना देणार कालबद्ध सेवा

तंजावर : करदाते हे राष्ट्र निर्माते आहेत. त्यांना अधिक सवलती मिळायला हव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.सीतारामन यांनी सांगितले की, करदात्यांच्या हक्कांची सनद सरकार लवकरच जाहीर करणार आहे. प्रामाणिक करदात्यांच्या सोयीसाठी सरकारने याआधी कर व्यवस्थेचे सुलभीकरण, पारदर्शकतेत सुधारणा आणि कर दरांत कपात यासारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत.तंजावर येथील प्रसिद्ध सस्त्रा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विधिज्ञ नानी पालखीवाला जन्मशताब्दी समारोहाला संबोधित करताना सीतारामन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असल्याचा मला आनंद आहे. करदात्यांना योग्य प्रकारे सेवा मिळायला हव्यात, असे पंतप्रधानांचे प्रामाणिक मत आहे. आम्ही करदात्यांना त्यांच्या हक्कांचा जाहीरनामा देणार आहोत. जगात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या फारच थोड्या राष्ट्रांत करदात्यांच्या हक्कांचा जाहीरनामा आहे.करदात्यांना हक्कांचा जाहीरनामा मिळायलाच हवा. आम्ही त्या दिशेने प्रयत्न करीत आहोत. मी आत्मनिर्भर भारत मोहिमेत याची घोषणा केली होती. आम्ही लवकरच हा जाहीरनामा घेऊन येत आहोत.अर्थसंकल्पात ‘करदात्यांच्या जाहीरनाम्या’ची घोषणा करण्यात आली होती. त्याचे स्वरूप घटनात्मक असेल. प्राप्तिकर विभागाकडून कालबद्ध पद्धतीने सेवा मिळण्यास करदाते त्याद्वारे पात्र ठरतील.सीतारामन यांनी सांगितले की, या देशातील कर व्यवस्था करदात्यांसाठी अंमलबजाणीच्या दृष्टीने सुलभ आणि सोपी करायला हवी, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेले आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी सरकारने मूल्यमापनाची ‘चेहराविहिन’ पद्धती स्वीकारली. पडताळणीत कपात केली. इतरही अनेक उपाय सरकारने केले आहेत.जगातील सर्वाधिक कमी कर दर असलेल्या देशांत भारताचा समावेशसीतारामन यांनी सांगितले की, सप्टेंबर २०१९ मध्ये आम्ही कॉर्पोरेट करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि आता भारत हा जगातील सर्वाधिक कमी कर दर असलेला एक देश आहे. कॉर्पोरेट कराची पद्धतीही आम्ही अधिक सुलभ केली आहे. त्यात आता कोणालाही सूट आणि लाभ नाही. सीतारामन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करदात्यांना ‘राष्ट्र निर्माते’ असेच संबोधतात. प्रामाणिक करदाते राष्ट्र उभारणीचेच काम करीत असतात. करदाते येणाऱ्या प्रत्येक सरकारला निधी उपलब्ध करून देत असतात. त्याच निधीद्वारे सरकारे सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम राबवितात. गोरगरिबांच्या उपजीविकेसाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन