शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

कारखरेदीतून होते करचोरी! दरवर्षी खरेदी होतात 25 लाख कार

By admin | Updated: December 27, 2016 20:29 IST

दहा लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांची संख्या देशात केवळ 24 लाख इतकी आहे. पण असे असतानाही देशात दरवर्षी 25 लाख नव्या कारची खरेदी होत असल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात कर चुकवण्यासाठी तसेच काळ्याचे पांढरे करण्यासाठी वापरण्यात येत असलेले विविध हातखंडे उघडकीस येत आहे. दहा लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्यांची संख्या देशात केवळ 24 लाख इतकी आहे. पण असे असतानाही  देशात दरवर्षी 25 लाख नव्या कारची खरेदी होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्यातील 35 हजार कार ह्या आलिशान श्रेणीतील असतात.  गेल्या पाच वर्षांपासून एवढ्याच संख्येने कारची खरेदी होत असल्याचे  एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 
याबाबत माहिती देताना प्राप्तिकर विभागाचे अधिकारी म्हणाले, "125 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात 2014-15 साली केवळ 3.65 कोटी लोकांनी आयटी रिटर्न भरला   होता. देशात असे खूप लोक आहेत ज्यांचे उत्पन्न अधिक आहे, पण ते करचौकटीच्या बाहेर आहेत." 
देशातील कारखरेदी करण्याची कुवत असलेल्या व्यक्तीपैकी बहुतांश लोक कराच्या चौकटीतून बाहेर असल्याचे सांगत हे अधिकारी पुढे म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांत देशात दरवर्षी सरासरी 25 लाख कार खरेदी केल्या गेल्या. गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे 25.03 लाख, 26 लाख आणि 27 लाख कार खरेदी करण्यात आल्या आहेत."
तसेच प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार देशातील केवळ 48 हजार 417 लोकांनीच आपले वार्षिक उत्पन्न एक कोटींपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही देशात दरवर्षी  बीएमडब्ल्यू, जग्वार, मर्सिडिझ आणि पाँर्शसारख्या 35 हजार महागड्या गाड्यांची खरेदी होते.