शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Tawang Clash : तवांगमध्ये चीनशी झालेल्या झटापटीवर अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणाले, "हे आता 1962 नाही, चोख उत्तर मिळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:57 IST

India China Clash : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमधील झटापटीवर वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 9 डिसेंबरला झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंच्या काही सैनिकांना किरकोळ दुखापत झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनकडून निवेदन देण्यात आले आहे. 

दरम्यान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमधील झटापटीवर वक्तव्य केले आहे. हा 1962 चा भारत नाही. भारतीय शूरवीर चीनला चोख प्रत्युत्तर देतील, असे त्यांनी म्हटले आहे.  यासंदर्भात पेमा खांडू यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, "यांगत्से माझ्या मतदारसंघात येतो आणि दरवर्षी मी त्या भागातील जवान आणि गावकऱ्यांना भेटतो. आता हा 1962 नाही. कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आमचे शूर जवान चोख प्रत्युत्तर देतील."

काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिले. चिनी सैन्याने 9 डिसेंबर रोजी तवांग सेक्टरमधील यांगत्से प्रदेशातील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांना परत जाण्यास भाग पाडले, असे राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. तसेच, या झटापटीत एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनैतिक स्तरावरही मांडण्यात आला असून अशा प्रकारची कारवाई करण्यास मनाई करण्यात आली आहे.

चीनने काय सांगितले?तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीवर चीनने सांगितले की, भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्यतः स्थिर आहे. तसेच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे सीमा मुद्द्यांवर सुरळीत संवाद साधला आहे. दरम्यान, वांग यांनी यांगत्से प्रदेशात 9 डिसेंबरला भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीची माहिती देण्यास नकार दिला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश