शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींची देणगी, प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक अन्...टाटांचा मोठा निर्णय! पीडित कुटुंबांसाठी 'विशेष ट्रस्ट' स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 20:48 IST

एअर इंडिया विमान अपघातातील बळींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने शुक्रवारी एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट नोंदणी केली.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर टाटा ग्रुपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त विमान एआय-१७१ मधील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने ५०० कोटी रुपयांचा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघातातील पीडितांसाठी विशेष ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा टाटा सन्सकडून करण्यात आली आहे. या ट्र्स्टच्या माध्यमातून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्काळ मदत पुरवली जाणार आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा ग्रुपने एक मोठे पाऊल उचलले आहे. टाटा सन्सने १८ जुलै रोजी मुंबईत एका सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी पूर्ण केली आणि या ट्रस्टचे नाव 'AI-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' ठेवण्याची घोषणा केली. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने या ट्रस्टला प्रत्येकी २५० कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे, ज्यामध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत समाविष्ट आहे. ट्रस्टच्या कामात जखमींवर उपचार आणि अपघातात नुकसान झालेल्या बीजे मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीत मदत करणे देखील समाविष्ट असेल.

या ट्रस्टचे व्यवस्थापन ५ सदस्यांच्या विश्वस्त मंडळाद्वारे केले जाईल. मंडळावर नियुक्त केलेले पहिले दोन विश्वस्त टाटा समूहाचे माजी दिग्गज एस. पद्मनाभन आणि टाटा सन्सचे जनरल कौन्सिल सिद्धार्थ शर्मा आहेत. त्याच वेळी, टाटा सन्सच्या जनरल कौन्सिलकडून लवकरच अतिरिक्त विश्वस्तांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, १२ जून रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान काही मिनिटांतच कोसळले. विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या छतावर कोसळले. या अपघातात, विमानातील एका व्यक्तीशिवाय सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली होती. अपघातग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. विमानातील २४१ जण जागीच मृत्यूमुखी पडले तर विश्वास कुमार रमेश नावाचा एकच प्रवासी वाचला होता.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाTataटाटा