शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

५०० कोटींची देणगी, प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक अन्...टाटांचा मोठा निर्णय! पीडित कुटुंबांसाठी 'विशेष ट्रस्ट' स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 20:48 IST

एअर इंडिया विमान अपघातातील बळींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने शुक्रवारी एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट नोंदणी केली.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर टाटा ग्रुपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त विमान एआय-१७१ मधील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने ५०० कोटी रुपयांचा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघातातील पीडितांसाठी विशेष ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा टाटा सन्सकडून करण्यात आली आहे. या ट्र्स्टच्या माध्यमातून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्काळ मदत पुरवली जाणार आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा ग्रुपने एक मोठे पाऊल उचलले आहे. टाटा सन्सने १८ जुलै रोजी मुंबईत एका सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी पूर्ण केली आणि या ट्रस्टचे नाव 'AI-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' ठेवण्याची घोषणा केली. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने या ट्रस्टला प्रत्येकी २५० कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे, ज्यामध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत समाविष्ट आहे. ट्रस्टच्या कामात जखमींवर उपचार आणि अपघातात नुकसान झालेल्या बीजे मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीत मदत करणे देखील समाविष्ट असेल.

या ट्रस्टचे व्यवस्थापन ५ सदस्यांच्या विश्वस्त मंडळाद्वारे केले जाईल. मंडळावर नियुक्त केलेले पहिले दोन विश्वस्त टाटा समूहाचे माजी दिग्गज एस. पद्मनाभन आणि टाटा सन्सचे जनरल कौन्सिल सिद्धार्थ शर्मा आहेत. त्याच वेळी, टाटा सन्सच्या जनरल कौन्सिलकडून लवकरच अतिरिक्त विश्वस्तांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, १२ जून रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान काही मिनिटांतच कोसळले. विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या छतावर कोसळले. या अपघातात, विमानातील एका व्यक्तीशिवाय सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली होती. अपघातग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. विमानातील २४१ जण जागीच मृत्यूमुखी पडले तर विश्वास कुमार रमेश नावाचा एकच प्रवासी वाचला होता.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाTataटाटा