शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

नियंत्रण रेषा ओलांडून पुन्हा दहशतवाद्यांना टार्गेट करु - भारत

By admin | Updated: October 10, 2016 11:56 IST

29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तान नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवादाची निर्यात करणार असेल तर, भारतीय लष्करही नियंत्रण रेषा ओलांडायला मागे-पुढे पाहणार नाही. 29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 
 
दहशतवादाच्या विषयावर भारताची भूमिका 1999 पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पाकिस्तानने त्यावेळी कारगिलमध्ये घुसखोरी करुनही भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती.  फक्त पाकिस्तानी सैन्याला भारतीय भूमीतून पिटाळून लावले होते. भारताची आताची भूमिका त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असे सूत्रांनी सांगितले. 
 
दहशतवादी भारतावर हल्ले करणार असतील तर, भारतही त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राखून आहे. पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सहा जानेवारी 2004 रोजी पाकिस्तानच्या नियंत्रणातील प्रदेशातून भारता विरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. पाकिस्तानला आपल्या भूमिकेचा विसर पडला आहे. दहशतवादी आणि त्यांना मदत करणा-या पाकिस्तानी लष्कराला संदेश देण्याचा या सर्जिकल स्ट्राईक्स मागचा मूळ उद्देश होता असे या अधिका-यांने सांगितले.