शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषा ओलांडून पुन्हा दहशतवाद्यांना टार्गेट करु - भारत

By admin | Updated: October 10, 2016 11:56 IST

29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तान नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवादाची निर्यात करणार असेल तर, भारतीय लष्करही नियंत्रण रेषा ओलांडायला मागे-पुढे पाहणार नाही. 29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 
 
दहशतवादाच्या विषयावर भारताची भूमिका 1999 पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पाकिस्तानने त्यावेळी कारगिलमध्ये घुसखोरी करुनही भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती.  फक्त पाकिस्तानी सैन्याला भारतीय भूमीतून पिटाळून लावले होते. भारताची आताची भूमिका त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असे सूत्रांनी सांगितले. 
 
दहशतवादी भारतावर हल्ले करणार असतील तर, भारतही त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राखून आहे. पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सहा जानेवारी 2004 रोजी पाकिस्तानच्या नियंत्रणातील प्रदेशातून भारता विरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. पाकिस्तानला आपल्या भूमिकेचा विसर पडला आहे. दहशतवादी आणि त्यांना मदत करणा-या पाकिस्तानी लष्कराला संदेश देण्याचा या सर्जिकल स्ट्राईक्स मागचा मूळ उद्देश होता असे या अधिका-यांने सांगितले.