शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

केंद्रीय संस्थांच्या दबावामुळेच तापस पॉल यांचे निधन; ममतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:01 IST

2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी माजी खासदार आणि अभिनेता तापस पॉल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तापस पॉल आणि सुलतान अहमद यांचे निधन केंद्र सरकारच्या संस्थांनी टाकलेल्या दबावामुळेच झाल्याचा आरोप ममता यांनी केला. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटले. 

बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते तापस पॉल यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. एक फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर तापस यांच्या प्रकृतीत बिघाड झाली होती. त्यानंतर ते 6 फेब्रुवारीपर्यंत व्हेंटीलेटरवर होते, असं त्यांच्या पत्नी नंदिता यांनी सांगितले. 

तापस पॉल यांच्या निधानंतर ममता म्हणाल्या की, सरकारच्या दबावामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन लोकांनी दडपण घेऊन प्राण सोडला आहे. यामध्ये टीएमसीचे खासदार प्रसून बॅनर्जी यांचे नावही ममता यांनी जोडले आहे. सध्या अनेकांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. मात्र सरकारी संस्था या लोकांवरील आरोप निश्चित करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप ममता यांनी केंद्र सरकारच्या संस्थावर केला आहे. 

दरम्यान कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. परंतु, मला तरी वाटत नाही की, तापस आणि इतर दोन नेत्यांनी काहीही गुन्हा केला असेल, असंही ममता यांनी नमूद केले आहे. 2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.