शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

केंद्रीय संस्थांच्या दबावामुळेच तापस पॉल यांचे निधन; ममतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:01 IST

2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी माजी खासदार आणि अभिनेता तापस पॉल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तापस पॉल आणि सुलतान अहमद यांचे निधन केंद्र सरकारच्या संस्थांनी टाकलेल्या दबावामुळेच झाल्याचा आरोप ममता यांनी केला. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटले. 

बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते तापस पॉल यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. एक फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर तापस यांच्या प्रकृतीत बिघाड झाली होती. त्यानंतर ते 6 फेब्रुवारीपर्यंत व्हेंटीलेटरवर होते, असं त्यांच्या पत्नी नंदिता यांनी सांगितले. 

तापस पॉल यांच्या निधानंतर ममता म्हणाल्या की, सरकारच्या दबावामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन लोकांनी दडपण घेऊन प्राण सोडला आहे. यामध्ये टीएमसीचे खासदार प्रसून बॅनर्जी यांचे नावही ममता यांनी जोडले आहे. सध्या अनेकांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. मात्र सरकारी संस्था या लोकांवरील आरोप निश्चित करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप ममता यांनी केंद्र सरकारच्या संस्थावर केला आहे. 

दरम्यान कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. परंतु, मला तरी वाटत नाही की, तापस आणि इतर दोन नेत्यांनी काहीही गुन्हा केला असेल, असंही ममता यांनी नमूद केले आहे. 2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.