शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

केंद्रीय संस्थांच्या दबावामुळेच तापस पॉल यांचे निधन; ममतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:01 IST

2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी माजी खासदार आणि अभिनेता तापस पॉल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तापस पॉल आणि सुलतान अहमद यांचे निधन केंद्र सरकारच्या संस्थांनी टाकलेल्या दबावामुळेच झाल्याचा आरोप ममता यांनी केला. केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटले. 

बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते तापस पॉल यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. एक फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर तापस यांच्या प्रकृतीत बिघाड झाली होती. त्यानंतर ते 6 फेब्रुवारीपर्यंत व्हेंटीलेटरवर होते, असं त्यांच्या पत्नी नंदिता यांनी सांगितले. 

तापस पॉल यांच्या निधानंतर ममता म्हणाल्या की, सरकारच्या दबावामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तीन लोकांनी दडपण घेऊन प्राण सोडला आहे. यामध्ये टीएमसीचे खासदार प्रसून बॅनर्जी यांचे नावही ममता यांनी जोडले आहे. सध्या अनेकांना कारागृहात पाठविण्यात येत आहे. मात्र सरकारी संस्था या लोकांवरील आरोप निश्चित करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप ममता यांनी केंद्र सरकारच्या संस्थावर केला आहे. 

दरम्यान कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी. परंतु, मला तरी वाटत नाही की, तापस आणि इतर दोन नेत्यांनी काहीही गुन्हा केला असेल, असंही ममता यांनी नमूद केले आहे. 2016 मध्ये चिटफंड घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने तापस पॉल यांना अटक केले होते. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. तेंव्हापासून त्यांनी चित्रपट आणि राजकारणापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.