शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 22:47 IST

Udhayanidhi : उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.

चेन्नई: तातामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली असून उद्या म्हणजेच २९ सप्टेंबरला चेन्नई येथील राजभवनात उदयनिधी स्टॅलिन यांचा शपथविधी होणार आहे. उदयनिधी हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.

मंगळवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते असे संकेत दिले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळात देखील बदल होऊ शकतात असे म्हटले होते. त्यानुसार, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यासह व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी, आर. राजेंद्रन आणि थिरू एसएम नासर यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. नवीन मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी ३.३० वाजता चेन्नई येथील राजभवनात होणार आहे. 

दरम्यान, तामिळनाडू सरकारने नुकतेच सुप्रीम कोर्टातून जामिनावर सुटलेल्या सेंथिल बालाजी यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दूध आणि दुग्धविकास मंत्री टी. मनो थंगाराज, अल्पसंख्याक कल्याण आणि अनिवासी तमिळ कल्याण मंत्री के. एस. मस्तान आणि पर्यटन मंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफारसही केली. मुख्यमंत्र्यांच्या या शिफारसीला राज्यपालांनीही मान्यता दिली आहे.

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कझगमच्या (DMK) विजयाचं श्रेय उदयनिधी यांना देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उदयनिधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तसेच, या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवता आला. त्यामुळे आता उदयनिधी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवायचा आहे. 

उदयनिधी कायम चर्चेतकाही दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्मावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. सनातन धर्म हा डेंग्यू मलेरियासारखा आहे, तो संपवायला हवा, असे विधान त्यांनी केले होते. त्यावरून बराच वाद झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना उदयनिधी म्हणाले होते की, सनातन धर्म संपवण्यासाठी आयोजित संमेलनात मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी सनातन धर्म संपवायला हवा. मच्छर, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यासारख्या गोष्टी ज्यांना आपण विरोध करू शकत नाही, आपल्याला ते संपवायला लागेल, असे उदयनिधी यांनी म्हटले होते. तसेच, कोरोना काळात जनसंपर्क अभियान राबवल्यामुळे पोलिसांनी उदयनिधी यांना अटक केली होती. त्यानंतर काही तासात सोडून दिले. २०२१ साली भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्या मृत्यूवर केलेल्या विधानामुळेही उदयनिधी चर्चेत आले होते. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू