शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

तामिळनाडू मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अपहरणकर्ता, गुन्हा दाखल

By admin | Updated: February 15, 2017 15:35 IST

शशिकला आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार पलानीसामी यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15 - तामिळनाडूत राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना अगोदरच गोत्यात अडकलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार शशिकला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शशिकला यांच्याच पक्षातील आमदार एस सर्वनन यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर शशिकला आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार पलानीसामी यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुवाथूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
 
अण्णा द्रमुकचे आमदार पन्नीरसेल्वम यांच्या गळाला लागू नये म्हणून शशिकला यांनी आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवले होते. सर्वनन तेच आमदार आहेत ज्यांनी शशिकला यांच्यावर रिसॉर्टमध्ये ओलीस ठेवल्याचा आरोप केला होता. संधी मिळाल्यावर सर्वनन यांनी भिंतीवरुन उडी मारुन रिसॉर्टमधून पळ काढला होता. 'मी वेष बदलून, भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता. तिथे असणारे 118 आमदार माझ्या भरवशावर आहेत', असं सर्वनन यांनी सांगितलं. 
 
व्ही. के. शशिकला यांची आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तुम्हाला तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून, या आदेशात कोणताही बदल केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दिलेल्या आदेशातील एकही शब्द बदलण्याचा आमचा विचार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांची तुरुंगवारी अटळ केली आहे.
 
मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना ६0 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा आणि दहा कोटी रुपये दंड  सुनावला असून आत्मसर्पण करण्याचा आदेश दिला आहे. शशिकला दोषी ठरल्याने मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शशिकला मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. पुढील सहा वर्ष शशिकलांना निवडणूक लढवता येणार नाही, तर पुढील दहा वर्ष त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होता येणार नाही. शशिकला निर्दोष ठरल्या असत्या तर शपथविधीसाठी राज्यपालांनी त्यांना पाचारण करण्याची शक्यता होती.
 
मात्र अटक होण्याआधी ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात शशिकला यशस्वी ठरल्या असून, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण असेल?, पनीरसेल्वम की पलानीसामी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात कायदेतज्ज्ञ व घटनातज्ज्ञ यांचा सल्ला घेतला आहे. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची कोंडी करण्यासाठी त्यांची व १८ नेत्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. मात्र शशिकला यांना तो अधिकारच नाही आणि पलानीस्वामी यांची निवडही बेकायदा आहे, असे पनीरसेल्वम सांगत आहेत.
 
जयललितांनी निलंबित केलेल्या पुतण्यांची शशिकलांकडून घरवापसी
जयललिता यांनी पक्षातून निलंबित केलेल्या पुतण्यांना शशिकला यांनी पुन्हा पक्षात प्रवेश दिला असून पक्षाची सुत्रे आपल्याच हाती राहतील याची पुर्ण खबरदारी घेतली आहे. शशिकला यांनी दिनकरन आणि व्यंकटेश ज्यांना 2011 मध्ये जयललितां यांनी पक्षातून निलंबित केलं होतं त्यांची शशिकला यांनी घरवापसी केली असून उप सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.