शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पाकशी आता चर्चा फक्त बळकावलेल्या काश्मीरवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे ठाम प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:06 IST

भारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

पंचकुला : आता यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती फक्त त्यांनी बळकावलेल्या काश्मीरसंबंधीच होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी येथे ठणकावून सांगितले. भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या शुभारंभानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. हरयाणा विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ही यात्रा काढली जात आहे. सर्व ६० मतदारसंघांतून फिरून ८ सप्टेंबर रोजी तिचा रोहतकमध्ये समारोप होईल.संरक्षणमंत्री म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणे शक्य नाही आणि जरी चर्चा झालीच तरी ती त्यांनी बळकावलेल्या काश्मीरखेरीज अन्य कोणत्याही विषयावर होणार नाही.पाकिस्तान जर दहशतवादाची कास सोडणार नसेल तर त्यांच्याशी चर्चा का आणि कशावर करावी, असाही त्यांनी सवाल केला. भारताने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्याने पाकिस्तान हतबल झाले असून आता काय करावे याची त्यांना चिंता लागली आहे, असे सांगून राजनाथ सिंग पुढे म्हणाले, आता पाकिस्तान आपली इभ्रत बचावण्यासाठी अनेक देशांना साकडे घालत आहे. पण अमेरिकेसारख्यासर्वात बलाढ्य देशानेही पाकिस्तानला चपराक दिली असून भारताशी चर्चा करून प्रश्न सोडवायला सांगत आहे. पाकिस्तानने भारताला धमक्या द्याव्यात असे आम्ही काय पाप केले आहे, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)बालाकोटचा हल्ला झाला, याची पाककडूनच कबुलीभारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाच्या मार्गाने भारतास कमकुवत करू पाहत आहे. पण याला खंबीरपणे कसे उत्तर द्यायचे हे ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह