शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पाकशी आता चर्चा फक्त बळकावलेल्या काश्मीरवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे ठाम प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:06 IST

भारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

पंचकुला : आता यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती फक्त त्यांनी बळकावलेल्या काश्मीरसंबंधीच होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी येथे ठणकावून सांगितले. भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या शुभारंभानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. हरयाणा विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ही यात्रा काढली जात आहे. सर्व ६० मतदारसंघांतून फिरून ८ सप्टेंबर रोजी तिचा रोहतकमध्ये समारोप होईल.संरक्षणमंत्री म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणे शक्य नाही आणि जरी चर्चा झालीच तरी ती त्यांनी बळकावलेल्या काश्मीरखेरीज अन्य कोणत्याही विषयावर होणार नाही.पाकिस्तान जर दहशतवादाची कास सोडणार नसेल तर त्यांच्याशी चर्चा का आणि कशावर करावी, असाही त्यांनी सवाल केला. भारताने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्याने पाकिस्तान हतबल झाले असून आता काय करावे याची त्यांना चिंता लागली आहे, असे सांगून राजनाथ सिंग पुढे म्हणाले, आता पाकिस्तान आपली इभ्रत बचावण्यासाठी अनेक देशांना साकडे घालत आहे. पण अमेरिकेसारख्यासर्वात बलाढ्य देशानेही पाकिस्तानला चपराक दिली असून भारताशी चर्चा करून प्रश्न सोडवायला सांगत आहे. पाकिस्तानने भारताला धमक्या द्याव्यात असे आम्ही काय पाप केले आहे, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)बालाकोटचा हल्ला झाला, याची पाककडूनच कबुलीभारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाच्या मार्गाने भारतास कमकुवत करू पाहत आहे. पण याला खंबीरपणे कसे उत्तर द्यायचे हे ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह