शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

भारत-चीन सीमावादावर चर्चा सुरू, पाकिस्तान आता जगाकडे भीक मागतोय: राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:54 IST

भारत-चीन चर्चेचा तपशील निश्चित करणे अद्याप बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आता पाकिस्तानातील खासदारही भारत वेगाने महाशक्ती बनत असल्याचे मान्य करत आहेत. मात्र, ते स्वत: कंगाल होण्यापासून वाचण्यासाठी जगाकडे भीक मागत आहेत, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी चीनच्याभारतीय भूमीवरील कथित घुसखोरीबाबत देशातील विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले. देशाची एक इंचही जमीन कोणीही बळकावू शकत नाही, असे राजनाथ म्हणाले.

देशाची एक इंचही जमीन...

  • संरक्षणमंत्री म्हणाले की, भाजपने आजपर्यंत देशाच्या सैनिकांच्या धैर्यावर आणि शौर्यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही; पण विरोधी पक्ष तसे प्रश्न नेहमीच विचारतात.
  • संरक्षणमंत्री या नात्याने मी तमाम नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की, देशाची एक इंचही जमीन कोणीही बळकावू शकत नाही.’ याआधीही अनेक वेळा केंद्र सरकारने चीनने भारताची जमीन बळकावल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे.

...तर लोकांना अभिमान वाटेल

भारत-चीन सीमावादावर संरक्षणमंत्र्यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले की, सध्या भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा चांगल्या वातावरणात होत आहे आणि मला वाटते की, आपण निकालाची वाट पाहिली पाहिजे. परंतु मी कोणत्या टप्प्यावर काय आहे, यावर चर्चा करू लागलो, तर देशातील लोकांना नक्कीच अभिमान वाटेल; पण मला आता काही उघड करायचे नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याने तपशील अद्याप निश्चित करणे बाकी आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तान