शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

भारत-चीन सीमावादावर चर्चा सुरू, पाकिस्तान आता जगाकडे भीक मागतोय: राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:54 IST

भारत-चीन चर्चेचा तपशील निश्चित करणे अद्याप बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आता पाकिस्तानातील खासदारही भारत वेगाने महाशक्ती बनत असल्याचे मान्य करत आहेत. मात्र, ते स्वत: कंगाल होण्यापासून वाचण्यासाठी जगाकडे भीक मागत आहेत, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी चीनच्याभारतीय भूमीवरील कथित घुसखोरीबाबत देशातील विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले. देशाची एक इंचही जमीन कोणीही बळकावू शकत नाही, असे राजनाथ म्हणाले.

देशाची एक इंचही जमीन...

  • संरक्षणमंत्री म्हणाले की, भाजपने आजपर्यंत देशाच्या सैनिकांच्या धैर्यावर आणि शौर्यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही; पण विरोधी पक्ष तसे प्रश्न नेहमीच विचारतात.
  • संरक्षणमंत्री या नात्याने मी तमाम नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की, देशाची एक इंचही जमीन कोणीही बळकावू शकत नाही.’ याआधीही अनेक वेळा केंद्र सरकारने चीनने भारताची जमीन बळकावल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे.

...तर लोकांना अभिमान वाटेल

भारत-चीन सीमावादावर संरक्षणमंत्र्यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले की, सध्या भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा चांगल्या वातावरणात होत आहे आणि मला वाटते की, आपण निकालाची वाट पाहिली पाहिजे. परंतु मी कोणत्या टप्प्यावर काय आहे, यावर चर्चा करू लागलो, तर देशातील लोकांना नक्कीच अभिमान वाटेल; पण मला आता काही उघड करायचे नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याने तपशील अद्याप निश्चित करणे बाकी आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तान