शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

झुंडशाही रोखण्यासाठी पावले उचला, अन्यथा गृह सचिवांना कोर्टात यावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:46 IST

विविध राज्यांमध्ये जमावाकडून होणाऱ्या हत्या (झुंडशाही) रोखण्यासाठी १७ जुलै दिलेल्या आदेशांची १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व राज्यांना दिले.

नवी दिल्ली : विविध राज्यांमध्ये जमावाकडून होणाऱ्या हत्या (झुंडशाही) रोखण्यासाठी १७ जुलै दिलेल्या आदेशांची १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व राज्यांना दिले. तसे न केल्यास गृह सचिवांनाच न्यायालयात हजर राहावे लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांना बजावले आहे.गोतस्करी वा लहान मुलांची चोरी अशा संशयातून अनेक राज्यांत जमावाकडून निरपराध लोकांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने याआधीही घेतली होती व केंद्र तसेच राज्य सरकारलांना फटकारले होते. १७ जुलैच्या आदेशानंतर अवघ्या तीनच दिवसांनी, २0 जुलै रोजी राजस्थानमध्ये जमावाने रकबार खान नावाच्या व्यक्तीला ठेचून मारले होते. त्यामुळे राजस्थानचे गृह सचिव व पोलीस प्रमुख न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका तेहसीन पुनावाला यांनी केली. त्यावरील सुनावणी आज झाली.या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी झाली. मंत्र्यांची समिती नेमून असे प्रकार कसे रोखता येतील, याचा अभ्यास केला जात आहे, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल सांगितले. याचिकाकर्ते व सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिस्रा, अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचुड यांनी राज्यांनी पुरेशी उपाययोजना केली नसल्याचे मत व्यक्त केले व त्या राज्यांना फटकारले.११ राज्यांनी केली अंमलबजावणीआतापर्यंत २९ राज्यांपैकी ११ राज्ये व सात केंद्रशासित प्रदेशांनी अंमलबजावणीबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.त्यामुळे उरलेल्या राज्यांनी आम्ही जुलैमध्ये दिलेल्या आदेशांची एका आठवड्यात म्हणजे १३ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करावी, ती न करणाºया राज्यांच्या गृह सचिवांना अन्यथा न्यायालयात उभे राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय