शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 15:52 IST

जूनमध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेब यांची अपहरण करुन हत्या केली होती

नवी दिल्ली: सुरक्षा दलाचे जवान औरंगजेब यांच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी त्यांचे 50 हून अधिक मित्र आखाती देशांमधून परतले आहेत. पोलीस आणि लष्करात दाखल होऊन औरंगजेबच्या हत्येचा बदला घेण्याचा त्यांचा मानस आहे. जूनमध्ये सुरक्षा दलाचे जवान औरंगजेब यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचे 50 हून अधिक मित्र आखाती देशांमधील चांगल्या नोकऱ्या सोडून माघारी परतले आहेत. यातील बहुतेकजण सौदी अरेबियात काम करत होते. पोलीस किंवा सैन्यात भरती होऊन मित्राच्या हत्येचा बदला घेण्याचा त्यांचा इरादा आहे. जून महिन्यात औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. मुलाच्या हत्या बदला घेऊ, अशी शपथ त्यावेळी शोकसागरात बुडालेल्या औरंगजेब यांच्या वडिलांनी घेतली होती. आता दोन महिन्यांनंतर औरंगजेब यांच्या सलानी गावातील 50 हून अधिक तरुण परदेशातील नोकऱ्या सोडून मायदेशी परतले आहेत. आम्ही 50 मित्रांनी औरंगजेबच्या मृत्यूची माहिती मिळताच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता, असं मोहम्मद किरामत आणि मोहम्मद ताज यांनी सांगितलं. आम्हाला आमच्या मित्राचा हत्येचा बदला घ्यायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या काश्मीर खोऱ्यातील अनेक जवानांना दहशतवाद्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. सैन्यातील नोकरी सोडा अन्य मरणास तयार राहा, अशा धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात येत आहेत. जूनपासून आतापर्यंत दहशतवाद्यांनी तीन जवानांच्या हत्या केल्या आहेत.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान