शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 15:52 IST

जूनमध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेब यांची अपहरण करुन हत्या केली होती

नवी दिल्ली: सुरक्षा दलाचे जवान औरंगजेब यांच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी त्यांचे 50 हून अधिक मित्र आखाती देशांमधून परतले आहेत. पोलीस आणि लष्करात दाखल होऊन औरंगजेबच्या हत्येचा बदला घेण्याचा त्यांचा मानस आहे. जूनमध्ये सुरक्षा दलाचे जवान औरंगजेब यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचे 50 हून अधिक मित्र आखाती देशांमधील चांगल्या नोकऱ्या सोडून माघारी परतले आहेत. यातील बहुतेकजण सौदी अरेबियात काम करत होते. पोलीस किंवा सैन्यात भरती होऊन मित्राच्या हत्येचा बदला घेण्याचा त्यांचा इरादा आहे. जून महिन्यात औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी घरी आले होते. त्यावेळी त्यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. मुलाच्या हत्या बदला घेऊ, अशी शपथ त्यावेळी शोकसागरात बुडालेल्या औरंगजेब यांच्या वडिलांनी घेतली होती. आता दोन महिन्यांनंतर औरंगजेब यांच्या सलानी गावातील 50 हून अधिक तरुण परदेशातील नोकऱ्या सोडून मायदेशी परतले आहेत. आम्ही 50 मित्रांनी औरंगजेबच्या मृत्यूची माहिती मिळताच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता, असं मोहम्मद किरामत आणि मोहम्मद ताज यांनी सांगितलं. आम्हाला आमच्या मित्राचा हत्येचा बदला घ्यायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या काश्मीर खोऱ्यातील अनेक जवानांना दहशतवाद्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. सैन्यातील नोकरी सोडा अन्य मरणास तयार राहा, अशा धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात येत आहेत. जूनपासून आतापर्यंत दहशतवाद्यांनी तीन जवानांच्या हत्या केल्या आहेत.  

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान