शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मनात शल्य व नाराजी ठेवून न्या. चेलमेश्वर झाले निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:24 IST

देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याचे शल्य व नाराजी मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर शुक्रवारी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले.

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याचे शल्य व नाराजी मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर शुक्रवारी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले. गेली साडेसहा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.वयोमानानुसार २२ मे न्या. चेलमेश्वर यांची निवृत्तीची तारीख. पण शनिवारपासून उन्हाळी सुटी लागत असल्याने शुक्रवार हा त्यांचा न्यायालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. एरवी सरन्यायाधीश व त्यांच्या नंतरचे ज्येष्ठतम न्यायाधीश एकाच खंडपीठावर नसणे ही न्यायालयाची परंपरा. परंतु क्रमांक २ चा न्यायाधीश निवृत्त होताना शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांनी त्यांना आपल्यासोबत घेऊन कोर्ट रूम नंबर १ मध्ये न्यायासनावर बसायचे अशी रूढ प्रथा आहे. त्यानुसार शुक्रवारी न्या. चेलमेश्वर सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यासोबत खंडपीठात बसले. पण एकाच दिवशी नेमणूक झालेल्या या दोन न्यायाधीशांपैकी एक सरन्यायाधीश झाला व दुसरा होऊ शकला नाही हा नियतीचा खेळ अनेकांच्या नजरेतून सुटला नाही.निवृत्त होणाऱ्या न्यायाधीशासाठी न्यायालयाकडून औपचारिक निरोप समारंभ होत नाही. वकील संघटना तसा निरोप समारंभ आयोजित करतात व त्यावेळी सरन्यायाधीशांसह अन्य न्यायाधीश निरोपाची भाषणे करतात. परंतु न्या. चेलमेश्वर यांनी निरोप समारंभाचे निमंत्रणही नाकारले. अलीकडेच न्या. के. एम. जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील नेमणुकीची ‘कॉलेजियम’ची शिफारस केंद्राने परत पाठविण्यावरून वाद झाला. त्यावेळी माजी सरन्यायाधीश न्या. आर. एम. लोढा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतील एक भाग न्यायाधीश निवडीमागे नेमके काय घडत असते त्याकडे निर्देश करणारा होता. भविष्यात कोण न्यायाधीश कुठे असावा याची काही गणिते मांडून ‘कॉलेजियम’ शिफारस करत असते, असे न्या. लोढा म्हणाले होते.‘कॉलेजियम’च्या अशाच गणितामुळे ज्येष्ठ असूनही न्या. चेलमेश्वर यांना सरन्यायाधीश न होता निवृत्त व्हावे लागले. उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांमधून सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश निवडले जातात. न्या. चेलमेश्वर मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिस्रा व न्या. जे. एस. केहार यांना दोन वर्षांनी ज्येष्ठ होते. न्या. चेलमेश्वर सन २००७ मध्ये तर न्या. मिस्रा व न्या. केहार सन २००९ मध्ये मुख्य न्यायाधीश झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक करताना न्या. केहार यांना सप्टेंबर २०११ मध्ये व न्या. चेलमेश्वर व न्या. मिस्रा यांना त्यानंतर एक महिन्याने म्हणजे आॅक्टोबर २०११ मध्ये नेमले गेले. न्या. चेलमेश्वर व न्या. मिस्रा यांचा सर्वोच्च न्यायालयात एकाच दिवशी शपथविधी झाला. न्या.मिस्रा यांनी आधी शपथ घेतल्याने सेवाज्येष्ठतेत ते ज्येष्ठ ठरले.उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक झाली असती, तर न्या. टी. एस ठाकूर जानेवारी २०१७ मध्ये सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर न्या. चेलमेश्वर त्या पदावर येऊ शकले असते. पण तसे न होता न्या. ठाकूर यांच्यानंतर न्या. केहार व त्यांच्यानंतर न्या. मिस्रा सरन्यायाधीश झाले. त्यामुळे ज्येष्ठ असूनही न्या. चेलमेश्वर यांना त्यांच्याहून कनिष्ठ दोन सरन्यायाधीशांसोबत क्र. २ वर काम करावे लागले. शेवटी न्यायाधीश हाही माणूसच असतो. त्यामुळे राग, लोभ, नाराजी या मानवी भावना न्यायदान करताना नव्हे तरी व्यक्तिगत पातळीवर मनात येतच असतात. न्या. चेलमेश्वर यांनी जाहीर पत्रकार परिषद घेण्यामागे मनातील या अव्यक्त नाराजीचाही एक कंगोरा होता.>...पण क्र. २ चे न्यायाधीश आजही स्मरणात!सरन्यायाधीशांच्या विरोधात जाहीर पत्रकार परिषद घेणारे न्यायाधीश म्हणून ते निवृत्तीनंतरही ते दीर्घकाळ स्मरणात राहतील.मात्र, ज्येष्ठ वकील व माजी केंद्रीय कायदामंत्री शांतीभूषण यांनी गुरुवारी मुद्दाम न्या. चेलमेश्वर यांच्या न्यायालयात येऊन छोटेखानी संबोधनाने न्या. चेलमेश्वर यांना भावपूर्ण निरोप दिला. न्या. चेलमेश्वर यांना उद्देशून शांतीभूषण म्हणाले की, तुमच्या या कोर्ट रूम नं. २ मध्ये न्या. एच. आर. खन्ना यांचे तैलचित्र राहिले आहे. न्या. खन्ना हेही सरन्यायधीश न होता क्र. २ चे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. भविष्यात तुमचाही फोटो या न्यायालयात लावला जावो, अशा आमच्या सदिच्छा आहेत. क्र. १ च्या यापूर्वीच्या अनेक सरन्यायाधीशांना देश विसरला, पण क्र. २ चे न्यायाधीश आजही स्मरणात आहेत, असा मार्मिक संदर्भही त्यांनी दिला. आणीबाणीत न्या. खन्ना यांची सेवाज्येष्ठता डावलून इंदिरा गांधींनी त्यांना डावलून न्या. रे यांना सरन्यायाधीश केले होते.