शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

डाळीच्या दरावर नियंत्रण आणा - शत्रुघ्न सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By admin | Published: October 16, 2015 2:08 PM

डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १६ - डाळीचे दर २०० रुपयांपर्यंत पोहोचले असून केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे अशा शब्दात अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यापूर्वी कांद्याने सर्वांच्या कसे रडवले होते हे विसरु नका असेही त्यांनी म्हटले आहे. 

पक्षविरोधी विधान भाजपाला अडचणीत आणणारे बिहारमधील भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने डाळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच बिहारला विकासाच्या वाटेवर नेणा-या पक्षाचाच विजय व्हावा असे सूचक ट्विटही त्यांनी केले. सध्याच्या सणासुदीच्या काळात वाईटावर चांगला प्रवृत्तीचा, खोट्या गोष्टीवर सत्याचा आणि अहंकारावर माणुसकीचा विजय व्हावा असेही त्यांनी नमूद केले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. तसेच भाजपाच्या प्रचारातही शत्रुघ्न सिन्हा फारसे सक्रीय नव्हते. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी डाळ बॉम्बने मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.