शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:28 IST

Pakistan-occupied Kashmir News: पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे. 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत काल एक महत्त्वाचं विधान केलं होतं. पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे. 

उमर अब्दुल्ला म्हणाले की, महाराजा बहादुर यांनी वारशामध्ये एक नकाशा तुम्हाला दिला होता. त्याचा एक भाग पाकिस्तानकडे आहे. तो भाग आम्ही परत मिळवू, असे परराष्ट्रमंत्री आज म्हणाले. पण तुम्हाला अडवलंय कुणी? कारगिल युद्ध झालं तेव्हाच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चांगली संधी भारताकडे होती. आताही केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यापासून कुणीही अडवलेले नाही. आता सरकराने पुन्हा प्रयत्न करावा आणि ते परत मिळवावं. तसेच चीनच्या ताब्यात असलेला  भागही परत घेतला पाहिजे. भाजपा सरकार चीनने कब्जा केलेल्या जम्मू काश्मीरबाबत का बोलत नाही, अशी विचारणाही उमर अब्दुल्ला यांनी केली.

दरम्यान, काल एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, सध्या पाकिस्तान काश्मीरच्या ज्या भागावर बेकायदेशीरपणे कब्जा करून बसला आहे, तो भाग जर परत आला तर काश्मीरचा पूर्ण प्रश्नच सुटून जाणार आहे. जयशंकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.   

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेOmar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारS. Jaishankarएस. जयशंकर