शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 20:28 IST

Pakistan-occupied Kashmir News: पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे. 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत काल एक महत्त्वाचं विधान केलं होतं. पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लगावत खोचक सल्ला दिला आहे. 

उमर अब्दुल्ला म्हणाले की, महाराजा बहादुर यांनी वारशामध्ये एक नकाशा तुम्हाला दिला होता. त्याचा एक भाग पाकिस्तानकडे आहे. तो भाग आम्ही परत मिळवू, असे परराष्ट्रमंत्री आज म्हणाले. पण तुम्हाला अडवलंय कुणी? कारगिल युद्ध झालं तेव्हाच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची चांगली संधी भारताकडे होती. आताही केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यापासून कुणीही अडवलेले नाही. आता सरकराने पुन्हा प्रयत्न करावा आणि ते परत मिळवावं. तसेच चीनच्या ताब्यात असलेला  भागही परत घेतला पाहिजे. भाजपा सरकार चीनने कब्जा केलेल्या जम्मू काश्मीरबाबत का बोलत नाही, अशी विचारणाही उमर अब्दुल्ला यांनी केली.

दरम्यान, काल एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, सध्या पाकिस्तान काश्मीरच्या ज्या भागावर बेकायदेशीरपणे कब्जा करून बसला आहे, तो भाग जर परत आला तर काश्मीरचा पूर्ण प्रश्नच सुटून जाणार आहे. जयशंकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर काश्मीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.   

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेOmar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारS. Jaishankarएस. जयशंकर