शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 07:45 IST

Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. 

जम्मू : भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. 

जम्मू विद्यापीठात आयोजित सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी सरकारच्या काळात देशाने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केल्याचे सांगत त्यांनी २०१६च्या सीमेपलीकडील सर्जिकल स्ट्राईक व २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्याचा संदर्भ दिला. भारत पूर्वीसारखा राहिला नाही. तो अधिक शक्तिशाली होत आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. 

‘सर्जिकल स्ट्राईक’चानिर्णय केवळ दहा मिनिटांत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई सुरू केली आणि पहिल्यांदाच देशालाच नव्हे तर जगालाही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा अर्थ काय आहे हे कळले,’ असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अवघ्या १० मिनिटांचा अवधी घेतला, असेही ते म्हणाले. यावरून त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसून येते. 

आमच्या सैन्याने केवळ या बाजूने दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केले नाही, तर त्यांचा खात्मा करण्यासाठी ते सीमेपलीकडेही गेले, असे ते म्हणाले. तेव्हा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  (वृत्तसंस्था)

‘भारताचे बोलणे जग लक्षपूर्वक ऐकते’n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे. आज भारत बोलतो तेव्हा जग लक्षपूर्वक ऐकते, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती, असे सिंह यावेळी म्हणाले.n सिंह यांचे हे वक्तव्य पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे. n या दौऱ्यांत अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. मोदींच्या वाढत्या विश्वासार्हतेचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, एका देशाचे पंतप्रधान त्यांना ‘बॉस’ म्हणतात, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, मोदी इतके लोकप्रिय आहेत की लोक त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेऊ इच्छितात.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत