शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वराज यूपीच्या रिंगणात?

By admin | Updated: July 4, 2016 05:17 IST

त्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मैदानात उतरवण्याची तयारी भाजपाने चालवली

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मैदानात उतरवण्याची तयारी भाजपाने चालवली आहे. राजधानीत सत्तेच्या निकटवर्ती वर्तुळात अशी चर्चा असून, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर तमाम पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी मुकाबला करू शकेल अशा प्रतिभाशाली नेत्यांच्या शोधात भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही प्रमुख पक्ष आहेत. सुषमा स्वराज यांचे नाव त्या दृष्टीने सर्वार्थाने अनुकूल असल्याचे भाजपाला वाटते. स्वराज माहेरच्या ब्राह्मण समाजातील असून, त्यांची राजकीय प्रतिमाही स्वच्छ आहे. राष्ट्रीय राजकारणात मायावती व अखिलेश यादव यांच्याहून वरचे स्थान ही स्वराज यांची आणखी एक जमेची बाजू आहे. एवढेच नव्हे तर केंद्रातील परराष्ट्रमंत्री हे राजकीय महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने फारसे आव्हानात्मक नसलेले पद सोडून उत्तर प्रदेशच्या समरांगणात आपले भाग्य अजमावण्याची त्यांची तयारी असल्याचेही कानावर आले आहे. भाजपला उत्तरप्रदेशात नेमका असाच चेहरा हवा होता, असे सांगण्यात येत आहे.उत्तरप्रदेशात काँग्रेसच्या प्रचारमोहिमेच्या प्रमुखपदाची सूत्रे पियांका गांधी वडेरा यांच्याकडे सोपवण्याची चर्चा दीर्घकाळापासून सुरू आहे. कार्यक र्त्यांच्या मागणीनुसार खरोखर तसे घडले तर २0१९ साली रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधींऐवजी प्रियांका लोकसभेच्या उमेदवार असतील, ही चर्चा देखील लपून राहिलेली नाही. गांधी घराण्यातील प्रियांकाच्या नेतृत्वाला राजकीय पातळीवर आव्हान देण्यासाठीही भाजपला प्रतिभाशाली चेहरा उत्तरप्रदेशात हवा आहे. स्वराज यांची दावेदारी त्या दृष्टिने महत्वाची ठरणार आहे. स्वराज यांच्या नेतृत्वाखाली भाजप खरोखर उत्तरप्रदेशात भगवा फडकवण्यात यशस्वी ठरला तर २0१९ नंतरच्या राष्ट्रीय राजकारणात स्वराज पंतप्रधानपदाच्या दावेदारही ठरू शकतात. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शाह या जोडीला ही बाब मानवेल काय? इतकाच काय तो प्रश्न आहे. तूर्त तरी स्वराज यांच्या दावेदारीवर भाजपमधे गांभीर्याने मंथन सुरू असल्याची माहिती आहे.>चार नावे मागे पडली भाजपाच्या वर्तुळात स्वराज यांच्यापूर्वी विद्यमान गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथसिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. तथापि आपल्या दावेदारीमुळे राज्यात भाजपाला सत्ता मिळवण्याइतपत यश मिळू शकले नाही तर केंद्रातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानालाही धक्का लागू शकतो, या चिंतेने राजनाथसिंगांना ग्रासले होते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या राजकीय जुगाराची जोखीम म्हणूनच राजनाथसिंग पत्करायला तयार नाहीत. अशा जोखमीचा प्रश्न सुषमा स्वराज यांच्याबाबत उद्भवत नाही.उत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी भाजपाने यापूर्वी खा़ योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, महेश शर्मा व खा़ वरुण गांधी अशी चार नावे प्रसारमाध्यमांद्वारे चर्चेत सोडून पाहिली. मात्र यापैकी एकाही नावाला हवा तसा प्रतिसाद राज्यात मिळाला नाही. सुषमा स्वराज यांचे नाव यानंतर चर्चेत अचानक पुढे आले आहे. भाजपाने मात्र त्यांचे नाव गुलदस्तात ठेवून त्याबाबतची चर्चा जाणीवपूर्वक टाळली आहे.>स्वराज माहेरच्या ब्राह्मण समाजातील असून, त्यांची राजकीय प्रतिमाही स्वच्छ आहे. राष्ट्रीय राजकारणात मायावती व अखिलेश यादव यांच्याहून वरचे स्थान ही स्वराज यांची आणखी एक जमेची बाजू आहे. >प्रियंका गांधी घेणार यूपीत १५० सभामेरठ : प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उतरणार असल्याने काँग्रेसला आवश्यक असलेल्या नव्या उत्साहासह चैतन्य लाभणार आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या १५० प्रचारसभा होतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रवक्त्याने सांगितले.