शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

गावांना त्यांच्याच भरवशावर सोडलं जाऊ शकत नाही; मोदींनी सांगितलं, का आणावी लागली स्वामित्व योजना?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 14:11 IST

"या योजनेमुळे देशातील गावांत एतिहासिक बदल होईल. लोकांत आत्मविश्वास वाढेल. तसेच गावांना त्याच्याच भरवशावर सोडलं जाऊ शकत नाही," असे मोदी म्हणाले. तेसेच, ही योजना का आणावी लागली? हेही मोदींनी सांगितले. (Swamitva Yojana, Narendra modi)

ठळक मुद्देस्वामित्व योजनेमुळे आपल्या ग्राम पंचायतींचेही व्यवस्थापन नगरपालिका आणि महानगरपालिकांसारखे व्यवस्थापन होईल.वर्षानूवर्षे जे लोक सत्तेत होते, त्यांनी गप्पा तर फार मोठ-मोठ्या मारल्या, मात्र, गावातील लोकांना त्यांच्याच नशिबावर सोडले.पुढील चार वर्ष राबवली जाणार योजना

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने आज (रविवार) 'स्वामित्व योजनेला' सुरुवात केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने मोदींनी या योजनेची सुरवात केली. या योजनेंतर्गत देशातील नागरिकांना संपत्ती कार्ड वितरित करण्यात येणार आहे. यावेळी, "या योजनेमुळे देशातील गावांत एतिहासिक बदल होईल. लोकांत आत्मविश्वास वाढेल. तसेच गावांना त्याच्याच भरवशावर सोडलं जाऊ शकत नाही," असे मोदी म्हणाले. तेसेच, ही योजना का आणावी लागली? हेही मोदींनी सांगितले. (SVAMITVA scheme)

का आणावी लागली योजना? -या वेळी मोदींनी, या योजनेची आवश्यकताही सांगितली. ते म्हणाले, "जगभरात केवळ एक तृतियांश लोकांकडेच आपल्या संपत्तीचे कायदेशीर रेकॉर्ड आहे. तर दोन तृतियांश लोकांकडे ते नाही. यामुळे आपल्या लोकांकडे त्यांच्या संपत्तीचे कायदेशीर रेकॉर्ड असणे हे भारतासारख्या विकसनशील देशांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. स्वामित्व योजनेमुळे आपल्या ग्राम पंचायतींचेही व्यवस्थापन नगरपालिका आणि महानगरपालिकांसारखे व्यवस्थापन होईल."

गांवांतील लोकांना त्यांच्याच भरवशावर सोडले जाऊ शकत नाही - मोदी म्हणाले, भारतातील गावांना त्यांच्याच भरवशावर सोडले जाऊ शकत नाही. "आपल्याकडे सातत्याने म्हटले जाते, गावांमध्ये भारताचा आत्मा आहे. मात्र, भारतातील गावांना त्यांच्याच भरवशावर सोडले गेले, हे वास्तव आहे. गावांत शौचालय आणि विजेची समस्या होती. गावांत चुल्हीवर स्वयंपाक तयार करावा लागायचा. वर्षानुवर्षे जे लोक सत्तेत होते, त्यांनी गप्पा तर फार मोठ-मोठ्या मारल्या, मात्र, गावातील लोकांना त्यांच्याच नशिबावर सोडले. मी असे होऊ देऊ शकत नाही."

Swamitva Yojana: PM मोदींनी लॉन्च केली स्वामित्व योजना; सांगितले, संपत्ती कार्डमुळे होणारे मोठे फायदे

असे आहेत फायदे  -पंतप्रधान मोदी म्हणाले, ही योजना म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. यामुळे गावाकडे राहणाऱ्या आपल्या भावा-बहिणींना आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होईल. यानंतर मोदींनी या योजनेचे फायदे सांगितले. ते म्हणाले, "संपूर्ण जगातील मोठ-मोठे एक्पर्ट्स सांगतात, की देशाच्या विकासात, जमीन आणि घरावरील मालकी हक्काची मोठी भूमिका असते. जेव्हा, संपत्तीचे रेकॉर्ड असते आणि संपत्तीवर अधिकार असतो, तेव्हा लोकांत आत्मविश्वास निर्माण होतो. संपत्तीचे रेकॉर्ड असते तेव्हा गुंतवणुकीसाठी दरवाजे खुले होतात. संपत्तीचे रेकॉर्ड असेल, तर बँकांकडूनही सहजपणे कर्ज मिळते आणि रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे मार्गही निर्माण होतात. 

पुढील चार वर्ष राबवली जाणार योजना -पंचायत राज मंत्रालयाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. 24 एप्रिल 2020 ला मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना 'रेकॉर्ड ऑफ राइट्स' देण्यासाठी संपत्ती कार्डचे वितरण करणे हा आहे. पुढील चार वर्षांत ही योजना राबविली जाणार आहे. याद्वारे देशातील 6.62 लाख गावांना लाभ दिला जाणार आहे. सध्या प्रायोगित तत्वावर १ लाख लोकांना लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाGovernmentसरकार