शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

"विदेशी वस्तूंवर बहिष्कार म्हणजे स्वदेशी मोहीम नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 02:41 IST

नव्या धोरणाची गरज : सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : सर्वच विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला असा स्वदेशी मोहिमेचा अर्थ कोणीही काढू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक धोरणे आखण्यात आली नाहीत. कोरोना संकटकाळामुळे विकासासाठी नवीन प्रकारचे धोरण आता राबविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.प्राध्यापक राजेंद्र गुप्ता यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात भागवत म्हणाले की भारतीयांमध्ये असलेल्या कर्तृत्वाला, कल्पकतेला वाव मिळेल अशी आर्थिक धोरणे स्वातंत्र्यानंतर कधीही राबविलीच गेली नाहीत; पण पूर्वी झाले नाही त्याची सुरुवात आता झाली आहे.ते म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन नेतृत्वाने रशियाच्या पंचवार्षिक योजनेचे अनुकरण करून तशी योजना भारतात राबविली. मात्र, हे करताना भारतीयांचे ज्ञान व क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात कार्यानुभावावर जोर देण्याची गरज आहे.विदेशातून आपल्याकडे कोणत्या गोष्टींची आयात होते यावर देशाची आत्मनिर्भरता ठरवता कामा नये. विदेशात जे जे उत्तम आहे, त्याचा स्वीकार करायचाच आहे; पण तो भारताने स्वत:च्या अटी घालून केला पाहिजे. स्वदेशीचा अर्थ सर्व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असा होत नाही.विकासाच्या तिसऱ्या प्रारुपाची गरजसरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, सध्या प्रचलित असलेल्या विकासाच्या दोन प्रारुपांनी मनुष्याला फारसे सुख लाभलेले नाही.कोरोनाच्या संकटकाळात तर ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळेच विकासाचे तिसरे प्रारूप पुढे आणण्याची गरज आहे. ते मूल्याधारित असेल.भारताला आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा नवा आराखडा डोळ्यासमोर ठेवून म्हणत आहेत, असेही भागवत म्हणाले.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, जगातील ज्ञानासंदर्भातील सर्व विचारांचा भारताने स्वीकार केला पाहिजे. आपल्या नागरिकांवर, त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल करणारा समाज या देशात निर्माण झाला पाहिजे.ऐहिकवाद, जडवादाच्या तार्किक परिणतीतून व्यक्तिवाद व ग्राहकवादाचा जन्म झाला. साºया जगाला एक वैश्विक बाजारपेठ बनविण्याचा विचार प्रबळ होऊ लागला. त्यादृष्टीने विकासाची व्याख्या करण्यात आली.त्यामुळे विकासाची दोन प्रारुपे सर्वांसमोर आली. एका प्रारुपात म्हटले आहे की, मनुष्याची सत्ता साºया जगावर आहे. तर दुसरे प्रारूप म्हणते की, साºया जगात समाजाचीच सत्ता आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत