शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:37 IST

Modi Govt News: हा आकडा १० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Modi Govt News: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्वच्छ भारत अभियान ५.० बाबत एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे. जितेंद्र सिंह मते, २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या विशेष मोहिमेने पहिल्या तीन आठवड्यात ३८७ कोटी रुपयांची कमाई केली. सरकारी कार्यालये आणि संस्थांमधून रद्दी आणि वापरात नसलेल्या वस्तू विकून यातून ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, ही मोहीम चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यात सुरू होत असताना, हा आकडा ₹८ हजार ते ₹१० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ सरकार केवळ स्वच्छतेतून हजारो कोटी रुपये वाचवत आहे आणि कमवत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत १.४८ कोटी चौरस फूट पेक्षा जास्त जागा मोकळी करण्यात आली आहे. ही मोकळी जागा आता सरकारी कामांसाठी, सार्वजनिक सेवांसाठी किंवा इतर उपयुक्त कारणांसाठी वापरली जाऊ शकते.

‘वेस्ट टू वेल्थ’ मोहिमेचे पुढे पाऊल

या वर्षीची मोहीम ‘वेस्ट टू वेल्थ’ या दृष्टिकोनातून पुढचे मोठे पाऊल उचलत आहे. एकेकाळी निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या गोष्टी आता संसाधने म्हणून पाहिल्या जात आहेत. कचरा काढून टाकल्याने केवळ पर्यावरण स्वच्छ होत नाही, तर महसूल देखील मिळतो. देशभरात स्वच्छतेचा स्तर आणखी सुधारण्यासाठी, या मोहिमेशी संबंधित सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून त्या सामायिक करण्याचा सल्ला डॉ. जितेंद्र सिंह यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांना दिला आहे. या अभियानात सार्वजनिक ठिकाणचे कचऱ्याचे ढीग साफ करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि कोलकत्तासारख्या महानगरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. यामध्ये हजारो स्वयंसेवकांनी भाग घेतला.

दरम्यान, या वर्षी ‘कचरे से धन’ अभियानाचा पुढील टप्पा राबविण्यात आला. कचऱ्याचा पुनर्उपयोग, पुनर्वापरावर भर देण्यात आला. वेस्ट-टू-वेल्थ मॉडलवर आधारीत अभियानावर सरकारने जोर दिला. हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणच नाही तर रोजगार निर्मितीसाठी पण खास ठरले. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘कचरे से धन’ या खास विशेष स्वच्छता अभियानातून कमाईचा सेतू साधण्यात आला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cleanliness to Prosperity: Modi Govt Earns ₹387 Crore from Waste!

Web Summary : The Swachh Bharat Abhiyan 5.0 earned ₹387 crore in three weeks by selling scrap from government offices. Expected earnings could reach ₹10,000 crore. Over 1.48 crore square feet of space was freed up for public use through the 'Waste to Wealth' initiative.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान