शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दिल्लीतील १६०० वकिलांच्या महाराष्ट्रातील पदव्या संशयास्पद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:49 IST

सत्यतेवर सवाल। मुदत संपूनही विद्यापीठांकडून पडताळणी नाही

नवी दिल्ली : दिल्ली बार कौन्सिलकडून सनद घेऊन राजधानीत वकिली करत असलेल्या १,६०० वकिलांच्या महाराष्ट्रातील चार विद्यापीठांच्या एलएलबी पदव्यांची पडताळणी अंतिम मुदत संपून गेल्यावरही अद्याप न झाल्याने या पदव्यांच्या खरेपणाविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. ज्यांच्या पदवीच्या खरेपणाची खातरजमा झालेली नाही अशा वकिलांची सनद रद्द करणे व ज्या विद्यापीठांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही पदव्यांची पडताळणी करून मुदतीत अहवाल दिले नाहीत, अशा विद्यापीठांची मान्यता रद्द करणे व अशा विद्यापीठांतून एलएल. बी पदवी घेतलेल्या वकिलांना सनद देणे यापुढे बंद करणे हे विषय दिल्ली बार कौन्सिलने आता अ.भा. बार कौन्सिलकडे सोपविले आहेत.

दिल्ली बार कौन्सिलकडून सनद घेतलेल्या वकिलांच्या एलएलबी पदव्यांची संबंधित विद्यापीठांकडून पडताळणी करून खातरजमा करून घेण्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. यासाठी बार कौन्सिलने ३० सप्टेंबर रोजी पत्र पाठवून पडताळणीसाठी १५ दिवसांची शेवटची मुदत दिली होती. यानंतरही ज्या विद्यापीठांनी पदव्यांची पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांचा तपशील दिल्ली बार कौन्सिलने गेल्या आठवड्यात अ.भा. बार कौन्सिलला कळविला आहे. दिल्ली बार कौन्सिलने त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या एकूण ३० हजार ७८१ वकिलांच्या एलएलबी पदव्या देशातील विविध विद्यापीठांकडे पडताळणीसाठी पाठविल्या होत्या त्यापैकी १४ हजार ८५१ पदव्यांची विद्यापीठांनी पडताळणी केली आहे व बाकीच्या १५,९३० वकिलांच्या पदव्यांची पडताळणी विद्यापीठांकडून अद्याप झालेली नाही.राज्यातील इतर विद्यापीठांची कामगिरीच्सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : एकूण पदव्या ८७०. पडताळणी झाली ५१९. पडताळणी बाकी ३५१.च्राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : एकूण पदव्या ७१. पडताळणी झाली ३५. पडताळणी बाकी ३६.च्अ‍ॅॅमिटी विद्यापीठ : एकूण पदव्या १.०५४. पडताळणी झाली ९२.च्पडताळणी बाकी ९६२.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कारवाईसर्वोच्च न्यायालयाच्या २०१७ च्या आदेशानुसार सर्व राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या वकिलांच्या एलएलबी पदवीची विद्यापीठांकडून पडताळणी करून घेण्याचे काम संबंधित राज्य बार कौन्सिल करत आहेत.पदव्यांची पडताळणी केल्याखेरीज कोणाही वकिलाचे नाव बार कौन्सिल निवडणुकीसाठी मतदारयादीत समाविष्ट करू नये, असा आदेश दिला गेला होता. त्यावेळी देशातील १५.३४ लाख वकिलांपैकी फक्त ३.५८ लाख वकिलांच्या पदव्यांची पडताळणी झालेली होती आणि १.२१ लाख वकिलांच्या पदव्या पडताळणीसाठी पाठविल्याही गेल्या नव्हत्या.दिल्ली बार कौन्सिलकडे महाराष्ट्रातून एलएलबी पदवी घेतलेल्या 2241 वकिलांची नोंद आहे. त्यांच्यापैकी फक्त 646 पदव्यांची पडताळणी विद्यापीठांनी केली असून 1595 पदव्यांची पडताळणी अद्याप व्पायची आहे.बार कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विद्यापीठाकडे २४६ पदव्या पडताळणीसाठी पाठविल्या होत्या. त्यापैकी एकाही पदवीची पडताळणी या विद्यापीठाने केलेली नाही.

टॅग्स :delhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय