शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

गोरखपूर घटनेतील बळींची संख्या 63, BRD कॉलेजच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 17:07 IST

गोरखपूर, दि. 12 - गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेताना ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 63 वर पोहोचली आहे. यामध्ये 30 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी असे ...

गोरखपूर, दि. 12 - गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेताना ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 63 वर पोहोचली आहे. यामध्ये 30 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी असे सांगितले की,  केवळ ऑक्सिजन अभावामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला असे नाही तर वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. पुढे ते असेही म्हणाले की 11.30 ते 1.30 वाजेदरम्यान ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात नव्हता, मात्र यादरम्यान कोणत्याही मुलाचा मृत्यू झाला नाही. याशिवाय, या प्रकरणी कारवाई करताना बीआरडी कॉलेजचे प्राध्यापक आर.के.मिश्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशात या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. विरोधक या प्रश्नी सरकाला घेरण्याच्या तयारीत आहेत. रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.  रुग्णालयात मागील एक महिन्यापासून ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्याही येत होत्या. पण तरीही या प्रकरणाची कल्पना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांना नव्हती. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी स्वत: या रुग्णालयाचा दौरा केला होता.

ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स या कंपनीने 1 ऑगस्टलाच पत्र लिहून रुग्णालय प्रशासनाला ऑक्सिजनची 69 लाख रुपये थकबाकी न दिल्यास पुरवठ्यावर परिणाम होईल, असा इशारा दिला होता. प्रशासनाने याची माहिती राज्य सरकारला दिली होती, अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान, कॉँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद, राज बब्बर आदि नेत्यांनीही रुग्णालयाला भेट दिली आहे. विरोधक याप्रकरणी आक्रमक झाले असून या घटनेस जबाबदार आरोग्यमंत्र्यांसह सर्वांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

बेजबाबदारपणाचा परिणामरुग्णालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे बालकांना प्राणास मुकावे लागले. या रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी लिक्विड ऑक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात आला होता. त्यातून सुमारे ३०० रुग्णांना पाइपद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. शुक्रवारी सकाळी ऑक्सिजन संपल्याने काही बालकांना अम्बू बॅग देण्यात आल्या. दुपारी १२ वाजता काही सिलिंडर पोहोचले; परंतु तरीही रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे. तेथे एका वॉर्डमध्ये दीड तासासाठी १६ सिलिंडर लागतात.

पुरवठा सुरू, पण... पोहोचणार रविवारपर्यंतइतकी बालके मरण पावल्यानंतर रुग्णालयाने पुरवठादाराचे २२ लाख रुपये भरण्याची तयारी सुरू केली व अखेर ऑक्सिनजचा पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र लिक्विड ऑक्सिजन पोहोचण्यास शनिवार किंवा रविवार उजाडणार आहे. यापूर्वीही याच रुग्णालयाचा ५० लाख रुपये वेळेत न भरल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.