शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशांत किशोर यांच्या पक्षप्रवेशावर सस्पेन्स; सोनिया गांधी विचारविनिमय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 07:23 IST

उदयपूरच्या चिंतन शिबिरातही मंथन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. 

हरीश गुप्ता नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर ऊर्फ पी. के. यांच्या बहुप्रतीक्षित काँग्रेस प्रवेशाला विलंब होताना दिसत आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्याऐवजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत अजून विचार करू इच्छितात. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी अधिकार असलेला कृती गट (ईएजी) - २०२४ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ईएजीच्या सदस्यांची नावेही आज रोखण्यात आली. राजस्थानातील उदयपूर येथे १३ मेपासून तीन दिवसांचे चिंतन शिबिर होत असून, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

साहजिकच, सोनिया गांधी यांना या विषयावर व्यापक विचारविनिमय करायचा असल्याने काँग्रेसने पीके यांच्या प्रवेशाची घोषणा पुढे ढकलली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सोनिया गांधी या अतिशय सावधान, सतर्क राहून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यापक विचारविमर्श करतात. तथ्य हे आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी ईएजीची स्थापना करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत योग्य वेळी ठोस निर्णय होईल.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. गतवर्षीच्या अपुऱ्या राहिलेल्या चर्चेनंतर अलीकडच्या काळात गांधी कुटुंबीय आणि पीके यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. समितीने याबाबतचा आपला अहवाल सोनिया गांधी यांना सोमवारी सोपविला. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, ईएजीची स्थापना करण्यात आली आहे. नव संकल्पासाठी उदयपूर येथे चिंतन शिबिर होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थकांसह पक्षात असे अनेक जण आहेत ज्यांनी पीके यांना महत्त्वाचे स्थान देण्यास विरोध केला आहे. कारण, ते स्थिर निष्ठा नसलेले व्यक्ती आहेत. त्याऐवजी पीके यांच्यासोबत काम करण्याची व्यवस्था असावी, असाही सल्ला या नेत्यांनी दिला आहे. 

पीके करणार टीआरएससाठी काम?

हैदराबाद : तेलंगणातील सत्तारूढ टीआरएसने रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या आय-पीएसी कंपनीसोबत (इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी) काम करण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील मंत्री के.टी. रामाराव यांनी याला दुजोरा दिला. तथापि, सूत्रांनी सांगितले की, किशोर यांनी यापूर्वीच आय-पीएसीपासून स्वत:ला वेगळे केले आहे. ही कंपनी देशातील अनेक पक्षांसोबत काम करते. प्रशांत किशोर यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केली होती.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस