शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टिष्ट्वट’ मिळताच सुषमा स्वराज मदतीला!

By admin | Updated: May 25, 2015 03:32 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सोशल मीडियावर अहोरात्र सजग असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना मदतीचा

मुंबई : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सोशल मीडियावर अहोरात्र सजग असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना मदतीचा हात किती तत्परतेने मिळू शकतो याची हृदयद्रावक प्रचिती तेहरानमध्ये अडकलेल्या नाशिकच्या एका शोकाकुल कुटुंबास रविवारी आली. या कुटुंबाची अडचण सुषमा स्वराज यांना समजल्यावर अवघ्या दोन तासांत तेहरानमधील भारतीय वकिलातील अधिकारी मदतीला धावून आला.मध्यपूर्व आशियातील देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि परदेस्थ भारतीयांच्या बाबींचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांची जाहीरपणे पाठ थोपटली होती. ते भारत सरकारने हाती घेतलेले संघटित व पूर्वनियोजित मिशन होते. पण तीच तत्परता व्यक्तिगत पातळीवरील अडचण सोडविण्यासाठीही दाखवून परराष्ट्र मंत्रालयाने संवेदनशील कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला आहे.नाशिक येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक कृष्णा आडगावकर पत्नी रुपाली ( वय ३८ वर्षे), मुलगा गोविंद, मुली श्रद्धा व पूजा आणि आई, मामा-मामी यांच्यासह ‘एसओटीसी’ टूर्समार्फत २२ दिवसांच्या युरोप सहलीसाठी गेले होते. सहल उरकून भारतात परत असताना या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जर्मनीतील म्युनिकहून मुंबईसाठी निघालेले त्यांचे विमान शनिवारी दुपारी सुमारे ४० हजार फूट उंचीवर असताना रुपाली आडगावकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. विमानाचा पुढील नियोजित थांबा दोहा येथे होता. परंतु ही आणिबाणी लक्षात घेऊन विमान तातडीने तेहरान विमानतळावर उतरविण्यात आले. तेथे रुपाली यांच्यावर उपचार केले गेले, पण दुर्दैवाने त्याचा उपयोग झाला नाही. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.अनोळखी देशात असा अनावस्था प्रसंग ओढवलेल्या आडगावकर कुटुंबास पुढे काय करावे हे सुचेना. त्यांनी कृष्णा यांचे एक मित्र व अहमदनगरमधील एक सराफ व्यावसायिक सागर कायगावकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना अडचण सांगितली. सागर यांनी नगरचेच एक उद्योजक मित्र अश्विन गांधी यांना ही हकीकत सांगितली. गांधी यांनी पंतप्रधान कार्यालय व परराष्ट्र मंत्रालयाला टिष्ट्वट करून ही माहिती दिली आणि मदतीची याचना केली. गांधी यांचे टिष्ट्वट मिळताच अवघ्या दीड तासांत सुषमा स्वराज यांनी तेहरान येथील भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यास आडगावकर कुटुंबियांच्या मदतीसाठी तेथील विमानतळावर रवाना केले व टिष्ट्वट करून तसे गांधी यांना कळविले.रुपाली मुळच्या अहमदनगरच्या होत्या. त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सोमवारी सकाळी ११ पर्यंत आडगावकर कुटुंबीय मृतदेह घेऊन नाशकात पोहोचू शकतील, असे त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)