शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंत्यसंस्काराहून परतत असताता भीषण अपघात, सुशांतसिंह राजपूतच्या नात्यातील पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 13:21 IST

Accident News: बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाटणा - बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पाच जण हे दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. लखिसराय जिल्ह्यातील पिपरा गावामध्ये शेखपुरा- सिकंदरा मार्गावर आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला.

पहाटेच्यावेळी टाटा सुमो आणि ट्रक यांच्यात टक्कर होऊन हा अपघात झाला. ही टक्कर एवढी भीषण होती की त्यात सहा जण जागीच मृत्युमुखी पडले. तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीसराय येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांपैकी पाच जण हे सुशांतसिंह राजपूतचे नातेवाईक होते. सुशांतसिंह राजपुतचे भाओजी आणि हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी ओमप्रकाश सिंह यांचे नातेवाईक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. ओमप्रकाश सिंह यांच्या बहिणीवर अंत्यसंस्कार करून त्यांच्या बहिणीचे पती त्यांचे दोन मुलगे आणि मुलीसह एकूण १० जण सुमोमधून माघारी परतत होते. तेव्हा लखीसरायजवळ हा अपघात झाला.

मृतांची ओळख लालजीत सिंह, नेमानी सिंह, रामचंद्र सिंह, बेबी सिंह, अनिता सिंह आणि प्रितम सिंह अशी पटली आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBiharबिहार