शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

शत्रू असला म्हणून काय झाले! सरेंडर करणाऱ्या पाकिस्तानी जनरलचे मॉब लिंचिंग झाले असते; भारताने वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:43 IST

India Pakistan 1971 War: पाकिस्तानच्या शरणागतीची न माहिती असलेली घटना.... भारताची जबाबदारी होती, गोळीच्या वेगाने जीप मैदानातून बाहेर पडली... नाहीतर...

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या तीन युद्धांचा उल्लेख केला. या युद्धांमुळेच पाकिस्तानात आज गरीबी आणि बेरोजगारी असल्याचे ते म्हणाले. तिन्ही युद्धांत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. त्यापैकीच एक युद्ध होते, बांग्लादेश मुक्तीसंग्राम. या युद्धाच्या सरेंडरच्या वेळची एक महत्वाची घडामोड आता समोर आली आहे. 

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली होती. त्या शरणागतीच्या मसुद्यावर सही करणारे पाकिस्तानचे जनरल नियाजी होते. नियाजी यांची सही होत नाही तोच, तिथे जमलेल्या जमावाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, नियाजी हे भारताची जबाबदारी होते. भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नियाजींचा जीव वाचविला होता. हा किस्सा लोकांच्या विस्मृतीतच गेला होता. 

16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी लष्करातील लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडसमोर आत्मसमर्पण दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. जनरल नियाझी हे जमावाकडून मारले गेले असते, परंतु मेजर जनरल गंधर्व नागरा यांनी त्यांचे शिताफीने प्राण वाचविले. 

परराष्ट्र मंत्रालयात तत्कालीन संयुक्त सचिव (पाकिस्तान डेस्क) असलेले एके रे हे एकमेव नागरी अधिकारी होते ज्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. युद्धादरम्यान मेजर जनरल जेकब हे भारताच्या पूर्व सैन्याचे कमांडर होते. मेजर जनरल गंधर्व नागरा देखील बांग्लादेशच्या विमानतळावर उपस्थित होते. यानंतर जनरल नियाझी येथे पोहोचले. जनरल नियाझी यांना रामना मैदानावर आणण्यात आले. या मैदानावर एक टेबल आणि काही खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. जनरल अरोरा यांनी या टेबलवर आत्मसमर्पण करण्याची कागदपत्रे ठेवली. 

पाकिस्तानी लष्कराचे केवळ 300 सैनिक मैदानावर उपस्थित होते. परंतू सामान्य नागरीकही आले होते. नियाझी यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. टोपी आणि बेल्ट काढला आणि रडू लागले, त्यावेळी जमावातील लोकांनी त्यांना ओळखले. यामुळे संतप्त जमाव त्यांच्यादिशेने येऊ लागला. नियाझी युद्धबंदी होते, यामुळे त्यांना वाचविण्याची भारताची जबाबदारी होती. 

नागरा यांनी प्रसंगावधान राखले आणि आपल्या सैनिकांचे कडे केले. बाजुलाच असलेल्या जीपमध्ये नियाझींनी बसवून गोळीच्या वेगाने ती जीप मैदानातून कॅन्टकडे निघाली आणि नियाझी वाचले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवान