शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:50 IST

Charanjit Singh Channi : काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.

काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत, त्यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल असं काही म्हटलं आहे ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर कोणालाही ते कळणार नाही का? असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं आहे. चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याची ही पहिलीच वेळ नाही, पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी असंच विधान केलं होतं.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, "आधी जेव्हा हल्ला झाला तेव्हा आमचे ४० लोक मृत्युमुखी पडले, त्यावेळी निवडणुका होत्या, आजपर्यंत मला हे कळू शकलं नाही की स्ट्राईक कुठे झाला होता, लोक कुठे मारले गेले, हल्ला पाकिस्तानात कुठे झाला? जर आपल्या देशात बॉम्ब पडला तर आपल्याला कळणार नाही का? हे लोक म्हणतात की, आम्ही पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केला, तसं काहीही घडलं नाही, सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, कोणालाही काहीही कळलं नाही."

हलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा

चरणजीत सिंग चन्नी यांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीबद्दल सांगितले होतं की, आज पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दुसरी बैठक होती. काँग्रेसने सरकारला आश्वासन दिलं आहे की, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दहशतवाद संपवण्यासाठी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आम्ही सरकारसोबत आहोत. पहलगाम मुद्द्यावरील विधानं टाळली पाहिजेत असं काँग्रेस हायकमांडने स्पष्ट केलं असतानाच चन्नी यांनी पुरावे मागितले आहेत.

 पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गँगकडून भारतीय सिस्टमवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर विभागाने डिजिटल हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPunjabपंजाब