शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

'आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:19 IST

भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट देवराज अंबू यांचा इशारा

डेहराडून : आवश्यकता भासल्यास भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) करेल, असे भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी म्हटले आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या (आयएमए) दीक्षांत संचलनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. या संचलनानंतर ४२७ प्रशिक्षणार्थी अधिकारी झाले. त्यातील ८० विद्यार्थी भारताच्या मित्रदेशांतून आयएमएमध्ये लष्करी शिक्षण घेण्यासाठी आले होते.अंबू म्हणाले की, सीमेपलीकडे असलेले दहशतवादी तळ लक्ष्यभेदी हल्ल्याद्वारे उद्ध्वस्त करून भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी क्षेत्रामध्ये लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी लक्ष्यभेदी हल्ला केला. त्यावेळी भूदलाच्या उत्तर कमांडचे प्रमुख असलेले व आता निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी शुक्रवारी चंदिगढ येथे एका कार्यक्रमात म्हटले होते की, हल्ला केल्यानंतर त्याची जी प्रचंड प्रसिद्धी करण्यात आली ती अनावश्यक होती. लक्ष्यभेदी हल्ला अत्यंत गुप्तता राखून करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतरही त्याचा फार गाजावाजा केला नसता तर बरे झाले असते.युद्धभूमीवर महिला?देवराज अंबू म्हणाले की, चीन व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा भागातील परिस्थिती देशातील इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे लष्करातील महिला जवानांना थेट युद्धभूमीवर लढण्यास पाठविण्याबाबतचे सारे पैलू तपासून पाहिले जात आहेत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी तयारी सुरू असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नोव्हेंबर महिन्यातच केले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान