शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:19 IST

भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट देवराज अंबू यांचा इशारा

डेहराडून : आवश्यकता भासल्यास भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) करेल, असे भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी म्हटले आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या (आयएमए) दीक्षांत संचलनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. या संचलनानंतर ४२७ प्रशिक्षणार्थी अधिकारी झाले. त्यातील ८० विद्यार्थी भारताच्या मित्रदेशांतून आयएमएमध्ये लष्करी शिक्षण घेण्यासाठी आले होते.अंबू म्हणाले की, सीमेपलीकडे असलेले दहशतवादी तळ लक्ष्यभेदी हल्ल्याद्वारे उद्ध्वस्त करून भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी क्षेत्रामध्ये लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी लक्ष्यभेदी हल्ला केला. त्यावेळी भूदलाच्या उत्तर कमांडचे प्रमुख असलेले व आता निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी शुक्रवारी चंदिगढ येथे एका कार्यक्रमात म्हटले होते की, हल्ला केल्यानंतर त्याची जी प्रचंड प्रसिद्धी करण्यात आली ती अनावश्यक होती. लक्ष्यभेदी हल्ला अत्यंत गुप्तता राखून करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतरही त्याचा फार गाजावाजा केला नसता तर बरे झाले असते.युद्धभूमीवर महिला?देवराज अंबू म्हणाले की, चीन व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा भागातील परिस्थिती देशातील इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे लष्करातील महिला जवानांना थेट युद्धभूमीवर लढण्यास पाठविण्याबाबतचे सारे पैलू तपासून पाहिले जात आहेत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी तयारी सुरू असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नोव्हेंबर महिन्यातच केले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान