शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

एससी/एसटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा – रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 14:23 IST

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायलायाने घेतलेल्या निर्णयावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी खास बातचीत केली.

- कोमल बडोदेकरनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) 20 मार्चला महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तक्रारीचा खरेपणा तपासल्याखेरीज यापुढे कोणाहीविरुद्ध गुन्हा नोंदविता येणार नाही. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदविला तरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी संमतीखेरीज आरोपीस अटकही करता येणार नाही, अशी तरतूद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात करण्यात आली आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ कायद्यातील बदल लागू करण्यात आले आहेत. यानंतर विविध दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. दलित संघटनांनी 2 एप्रिलला भारत बंदचे आवाहन केले आहे. तर केंद्र सरकारने निर्णयाच्या 9 दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयान पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाला या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यास आणि इतर बाबींवर विचार करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि या संपूर्ण विषयावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी खास बातचीत केली. सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबात दिलेल्या निर्णयाविषयी प्रश्न विचारला असता “ दलितांचे रक्षण करण्यासाठी हा कायदा थोडा अधिक कठोर करायला हवा. मात्र याचा अर्थ असा नाही की त्याच्या पूर्णपणे उलट करण्यात यावे. यामुळे दलितांवर होणाऱ्या अत्याचारात आणखी वाढ होईल. केंद्र सरकारने आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही या गोष्टीला नाकारत हा निर्णय दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने घेतला आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खरचं दलितांचे मदतनीस आहेत का किंवा त्यांच्याविषयी दुहेरी वृत्ती आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना आठवलेंनी “नरेंद्र मोदींनी दलित समाजासाठी काम केले आहे”, असे म्हटले. तसेच ऊना हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी नरेंद्र मोदींनी त्यावेळी “दलितांना मारू नका… त्यांच्यावर अत्याचार करू नका… मला मारा…” असे म्हटल्याची आठवण करून दिली. काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासोबत ‘रामजी ’ जोडण्याच्या निर्णयावर आठवले यांना विचारले असता रामजी आणि भगवान राम यांच्यात काहीही संबंध नसल्याचे म्हटले. “हा निर्णय भगवान राम यांच्याशी संबंधित नाही. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते आणि महाराष्ट्रात आपल्या नावानंतर वडिलांचे नाव लावण्याची परंपरा आहे. म्हणूनच संविधानात बाबासाहेबांनी आपले पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले आहे. तसेच हा निर्णय उत्तर प्रदेश सरकारचा आहे, त्यामुळे मला वाटत नाही हा निर्णय संपूर्ण देशात लागू होईल,” असेही आठवले यांनी सांगितले.

मोदी सरकार दलितांची संरक्षण आणि मदत करत असताना भीम सेनेचे अध्यक्ष अजूनही कारागृहात का?, असा प्रश्न लोकमतने आठवले यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना “सहारनपूर वादानंतर चंद्रशेखर यांना अटक करण्यात आले, तेव्हापासून ते कारागृहात आहेत. त्यांचे एवढ्या काळासाठी कारागृहात राहणे ठीक नाही. त्यांच्या सुटकेबाबत मी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्य़ाशी चर्चा करणार आहे. तसेच त्यांची सुटका लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणार”, असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात विविध दलित संघटनांनी 2 एप्रिलला भारत बंदचे आवाहन केले आहे, याविषयी बोलताना आठवलेंनी ‘आंदोलन करावे की न करावे’ हा संपूर्णपणे त्या संघटनांचा निर्णय असल्याचे म्हटले. आमचे सरकार या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले