शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सुप्रीम कोर्टामुळे बोथट झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकार पुन्हा करणार कडक, विधेयक मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 06:26 IST

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.हे विधेयक याच अधिवेशनातच मांडून ते मंजूर करून घेतले जाईल, असे समजते. विरोधी पक्ष दलित हिताच्या या विधेयकास विरोध करणार नाहीत व ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ सर्वसंमतीने पूर्वस्थितीत आणला जाईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.दलित संघटनांनी या निकालाचा निषेध केलाच होता, परंतु गेल्या चार महिन्यांत काहीच हालचाल न दिसल्याने सरकारची दलितविरोधी अशी प्रतिमा समाजात निर्माण झाली. त्यातच हा निकाल देणारे न्या. ए. के. गोएल यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणावर अध्यक्षपदी नेमणूक केल्याने दलित संतप्त झाले. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने त्वरित कायदा करावा व न्या. गोएल यांना अध्यक्षपदावरून हटवावे, यासाठी रेटा लावला. एवढेच नव्हे, तर सरकारला आमचा पाठिंबा गृहित धरू नये, असेही सांगितले. रामदास आठवले यांनीही ही मागणी लावून धरली. त्यातच दलित संघटनांनी ९ आॅगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे हे कायदा दुरुस्ती विधेयक तातडीने मांडण्याचे ठरले.संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने, या विधेयकाचा तपशील सांगण्यास कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी असमर्थता दर्शविली. अनुसूचित जाती व जमातींचे हित जपण्यासाठी कोणत्याही थरास जाण्याची सरकारची तयारी आहे, असे ते म्हणाले.पासवान यांनी मात्र विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे व ते याच अधिवेशनात मांडले जाईल, असे अधिकृतपणे जाहीर केले. जे कोणी या विधेयकास विरोध करतील, ते स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतील, असे पासवान म्हणाले. सरकारला दलितविरोधी म्हणणाऱ्यांना या निर्णयाने जोरदार चपराक मिळाली आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.या विधेयकात काय आहेत तरतुदीकोणत्याही न्यायनिर्णयात काहीही म्हटले असले, तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यापूर्वी तक्रारीच्या खरेपणाची कोणतीही शहानिशा करण्याची गरज असणार नाही, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीन मागण्याचीही सोय असणार नाही.आरोपीस अटक करायची की नाही, हे ठरविण्याचा अधिकार दंड प्रक्रिया संहितेने तपासी अधिकाºयास दिलेला आहे. तो प्राथमिक चौकशीच्या नावाने काढून घेतला जाऊ शकत नाही किंवा त्या अधिकारावर मर्यादाही घालता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी हा निकाल दिला तेव्हाच तो आपल्याला मान्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका करू व वेळ पडली तर वटहुकूमही काढू, असेही त्या वेळी सरकारने म्हटले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय