शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सुप्रीम कोर्टामुळे बोथट झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा केंद्र सरकार पुन्हा करणार कडक, विधेयक मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 06:26 IST

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) अटक व अटकपूर्व जामिनाच्या कडक तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याच्या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.हे विधेयक याच अधिवेशनातच मांडून ते मंजूर करून घेतले जाईल, असे समजते. विरोधी पक्ष दलित हिताच्या या विधेयकास विरोध करणार नाहीत व ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ सर्वसंमतीने पूर्वस्थितीत आणला जाईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.दलित संघटनांनी या निकालाचा निषेध केलाच होता, परंतु गेल्या चार महिन्यांत काहीच हालचाल न दिसल्याने सरकारची दलितविरोधी अशी प्रतिमा समाजात निर्माण झाली. त्यातच हा निकाल देणारे न्या. ए. के. गोएल यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणावर अध्यक्षपदी नेमणूक केल्याने दलित संतप्त झाले. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने त्वरित कायदा करावा व न्या. गोएल यांना अध्यक्षपदावरून हटवावे, यासाठी रेटा लावला. एवढेच नव्हे, तर सरकारला आमचा पाठिंबा गृहित धरू नये, असेही सांगितले. रामदास आठवले यांनीही ही मागणी लावून धरली. त्यातच दलित संघटनांनी ९ आॅगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यामुळे हे कायदा दुरुस्ती विधेयक तातडीने मांडण्याचे ठरले.संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने, या विधेयकाचा तपशील सांगण्यास कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी असमर्थता दर्शविली. अनुसूचित जाती व जमातींचे हित जपण्यासाठी कोणत्याही थरास जाण्याची सरकारची तयारी आहे, असे ते म्हणाले.पासवान यांनी मात्र विधेयकास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे व ते याच अधिवेशनात मांडले जाईल, असे अधिकृतपणे जाहीर केले. जे कोणी या विधेयकास विरोध करतील, ते स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतील, असे पासवान म्हणाले. सरकारला दलितविरोधी म्हणणाऱ्यांना या निर्णयाने जोरदार चपराक मिळाली आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.या विधेयकात काय आहेत तरतुदीकोणत्याही न्यायनिर्णयात काहीही म्हटले असले, तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यापूर्वी तक्रारीच्या खरेपणाची कोणतीही शहानिशा करण्याची गरज असणार नाही, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीन मागण्याचीही सोय असणार नाही.आरोपीस अटक करायची की नाही, हे ठरविण्याचा अधिकार दंड प्रक्रिया संहितेने तपासी अधिकाºयास दिलेला आहे. तो प्राथमिक चौकशीच्या नावाने काढून घेतला जाऊ शकत नाही किंवा त्या अधिकारावर मर्यादाही घालता येणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी हा निकाल दिला तेव्हाच तो आपल्याला मान्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका करू व वेळ पडली तर वटहुकूमही काढू, असेही त्या वेळी सरकारने म्हटले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय