शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

देशाच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार, प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 22:02 IST

केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनी देशातील सध्याच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

वकील इंदिरा जयसिंह यांच्या The Leaflet या वेबसाइटला हरिश साळवे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाला दोषी ठरवले आहे. 2012 मध्ये 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी दूरसंचार ऑपरेटर्ससाठी जारी करण्यात आलेल्या 122 स्पेक्ट्रम लायसन्स रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाने अर्थव्यवस्थेच्या घसरणीला प्रेरित केल्याचे हरिश साळवे यांनी सांगितले आहे.

हरीश साळवे म्हणाले , " 2 जीमधील लायसन्सच्या चुकीच्या वितरणासाठी लोक जबाबदार असल्याचे मी समजू  शकतो...ज्या ठिकाणी विदेशी गुंतवणूक करत आहेत, त्याठिकाणी लायसन्स रद्द करा...पाहा, ज्यावेळी एखाद्या विदेशी व्यक्तीने गुंतवणूक केली होती. त्यावेळी हा नियम होता की त्यामध्ये म्हटले होते की एक भारतीय भागीदार असणे आवश्यक आहे. विदेशींना माहीत नव्हते की भारतीय भागीदाराला लायसन्स कसे मिळाले." याचबरोबर, विदेशींनी अरब डॉलरची गुंतवणूक केली आणि सुप्रीम कोर्टाने एक पेनाच्या झटक्याने सर्वांना बाहेर केले. तेव्हापासून अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली, असेही हरीश साळवे यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता. यात 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये 122 लायसन्स रद्द करत याप्रकरणात 11दूरसंचार कंपन्यांच्या बाजूने हरिश साळवे यांनी केलेला युक्तीवाद फेटाळून लावला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEconomyअर्थव्यवस्था