शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पद्मनाभ मंदिराचे सरकारी नियंत्रण सुप्रीम कोर्टाने फेटाळले, त्रावणकोर राजघराण्याचा व्यवस्थापन हक्क अबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 05:45 IST

स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करताना तेथील संस्थानिक व भारत सरकार यांच्यात जो करार झाला होता त्यानुसार या पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनाचा हक्क ‘विश्वस्त’ या नात्याने संस्थानिकांकडेच कायम ठेवण्यात आला होता.

नवी दिल्ली : देशातील अत्यंत धनाढ्य हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या थिरुवनंतपुरममधील सुप्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन व नियंत्रण पूर्णपणे केरळ सरकारच्या हाती सोपविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ज्या त्रावणकोर संस्थानाने हे मंदिर बांधले त्या संस्थानाचे अखेरचे शासक आज हयात नसले तरी त्यांच्या निधनाने मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा त्या राजघराण्याचा हक्क संपुष्टात येत नाही. त्यांचे वारसदार आजही त्या मंदिराचे विश्वस्तच आहेत, असे न्यायालयाने जाहीर केले.हे मंदिर पूर्वीच्या राजांनी सार्वजनिक मंदिर म्हणून बांधलेले आहे. त्यामुळे मंदिर व त्याची संपत्ती ही राजघराण्याची खासगी मालमत्ता नाही. परिणामी शेवटच्या महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांकडे मंदिराची मालकी नव्हे तर व्यवस्थापनाचा हक्क वारसाहक्काने येतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करताना तेथील संस्थानिक व भारत सरकार यांच्यात जो करार झाला होता त्यानुसार या पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनाचा हक्क ‘विश्वस्त’ या नात्याने संस्थानिकांकडेच कायम ठेवण्यात आला होता. ज्यांनी हा करार केला ते त्रावणकोरचे शेवटचे संस्थानिक चित्र तिरुनल बलराम वर्मा यांचे १९९१ मध्ये निधन झाल्यावर हा विश्वस्तपदाचा हक्क संपुष्टात येतो की वारसाहक्काने त्यांच्या वारसांकडे जातो, हा या प्रकरणात मुख्य मुद्दा होता.बलराम वर्मा यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू मार्तंड वर्मा यांनी विश्वस्त म्हणून मंदिराचे व्यवस्थापन पाहणे सुरु केले. नंतर मंदिराचे व्यवस्थापन केरळ सरकारने ताब्यात घ्यावे यासाठी तेथील उच्च न्यायालयात अपील केले गेले. न्यायालयाने ते मंजूर केले. मार्तंड वर्मा यांनी त्याविरुद्ध अपील केले. त्यावर हा निकाल झाला.कोषागारात अमाप संपत्तीगेल्या शेकडो वर्षांत राजघराण्याने व भाविकांनी दान दिलेली अपाम संपत्ती या मंदिराच्या कोषागारांमध्ये ठेवलेली आहे. मध्यंतरी न्यायालयाने ती कोषागारे उघडून त्यातील संपत्तीची खानेसुमारी करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी क्र. १५ चे कोषागार सोडून अन्य कोषागारे उघडली गेली. त्यातील संपत्ती ९० हजार कोटी रुपयांची असावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त केला गेला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKeralaकेरळ