शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयाद्यांच्या मसुद्याचे प्रकाशन थांबविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:51 IST

बिहारच्या मतदारयाद्यांशी संबंधित मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा राज्यसभेत गोंधळ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या मसुद्याचे प्रकाशन थांबविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. या राज्यात निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनाविरुद्ध दाखल याचिकांवर कायमस्वरूपी अंतिम निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. सूर्यकांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या न्यायपीठाने अंतिम सुनावणीसाठी वेळापत्रक २९ जुलै रोजी निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले. 

आधार, मतदार ओळखपत्र योग्यच

सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने मतदारांच्या पडताळणीसाठी आधार व निवडणूक ओळखपत्र स्वीकारणे चालू ठेवावे, असेही न्यायालयाने आयोगाला सांगितले. हे दोन्ही दस्तावेज विश्वासार्हतेच्या दृष्टीने योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

बिहारवरून राज्यसभेत पुन्हा गोंधळ

बिहारच्या मतदारयाद्यांशी संबंधित मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा राज्यसभेत गोंधळ झाला. विरोधी पक्षांनी मतदारयाद्यांच्या पुनरावलोकनासह इतर मुद्द्यांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. यादरम्यान कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. दुपारी कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहार