शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘नीट’, ‘जेईई’ परीक्षा होणार ठरल्या वेळीच, तारखा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:57 IST

कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.

नवी दिल्ली: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) व ‘आयआयटीं’सह अन्य राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘जेईई’ या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने लाखो प्रवेशेच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’ने दोन वेळा ठरलेल्या तारखा पुढे ढकलून परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.>लाखो उमेदवारांची नोंदणीपरीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशभरातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ साठी तर सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. निर्बंध पाळून परीक्षा घेता याव्यात यासाठी ‘एनटीए’ने परीक्षाकेंद्रांची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. शिवायी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आधी निडलेले परीक्षाकेंद्र ऐनवेळी बदलण्याची मुभाही उमेवारांना देण्यात आली आहे.>परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे...विद्यार्थी त्यांच्यासोबत हँड सॅनेटायझर, मास्क, पाण्याची बाटली, पेन आणि पेन्सिल घेऊन जाऊ शकतात.आधीसारखेच कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे दागिने, कानातले घातला येणार नाहीत.कोणताही ड्रेसकोड नसेल. त्यामुळे ड्रेसकोड नाही म्हणून कोणत्याही केंद्रावर विद्यार्थ्याला अडवता येणार नाही.आता जेईईची परीक्षा सलग सहा दिवस १२ सत्रांमध्ये होईल.६ सप्टेंबर रोजी असलेल्या एनडीएच्या परीक्षेला बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देण्यात अडचणी येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून २४ ते ३१ जुलैच्या काळात पुन्हा अर्ज मागवले होते. एनडीएच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना जेईईची परीक्षा सुरुवातीच्या टप्प्यात देता येणार आहे. त्यामुळे त्यांना एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे.जेईईच्या मुख्य परीक्षेसाठी ८.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.>कोर्ट काय म्हणाले : महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करियर टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही.एनईटीचे म्हणणे : कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून परीक्षा घेता येतील, याची खात्री करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.