शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’, ‘जेईई’ परीक्षा होणार ठरल्या वेळीच, तारखा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:57 IST

कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.

नवी दिल्ली: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) व ‘आयआयटीं’सह अन्य राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘जेईई’ या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने लाखो प्रवेशेच्छुक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’ने दोन वेळा ठरलेल्या तारखा पुढे ढकलून परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. कोरोना महामारीचा जोर ओसरला नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी विविध राज्यांमधील ११ विद्यार्थ्यांनी याचिका केली होती. ती फेटाळण्यात आली.>लाखो उमेदवारांची नोंदणीपरीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यापासून देशभरातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ साठी तर सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. निर्बंध पाळून परीक्षा घेता याव्यात यासाठी ‘एनटीए’ने परीक्षाकेंद्रांची संख्या जवळजवळ दुप्पट केली आहे. शिवायी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आधी निडलेले परीक्षाकेंद्र ऐनवेळी बदलण्याची मुभाही उमेवारांना देण्यात आली आहे.>परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे...विद्यार्थी त्यांच्यासोबत हँड सॅनेटायझर, मास्क, पाण्याची बाटली, पेन आणि पेन्सिल घेऊन जाऊ शकतात.आधीसारखेच कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे दागिने, कानातले घातला येणार नाहीत.कोणताही ड्रेसकोड नसेल. त्यामुळे ड्रेसकोड नाही म्हणून कोणत्याही केंद्रावर विद्यार्थ्याला अडवता येणार नाही.आता जेईईची परीक्षा सलग सहा दिवस १२ सत्रांमध्ये होईल.६ सप्टेंबर रोजी असलेल्या एनडीएच्या परीक्षेला बसू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देण्यात अडचणी येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून २४ ते ३१ जुलैच्या काळात पुन्हा अर्ज मागवले होते. एनडीएच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना जेईईची परीक्षा सुरुवातीच्या टप्प्यात देता येणार आहे. त्यामुळे त्यांना एनडीएची परीक्षा देणे शक्य होणार आहे.जेईईच्या मुख्य परीक्षेसाठी ८.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर नीटच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.>कोर्ट काय म्हणाले : महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करियर टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही.एनईटीचे म्हणणे : कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून परीक्षा घेता येतील, याची खात्री करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.