शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 05:47 IST

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्य सरकारची विनंती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/नवी दिल्ली : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (५३) याच्यासह इतर पाच कथित नक्षलवाद्यांची निर्दोष सुटका करणाऱ्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या ५ मार्चला संबंधित निर्णय दिला. त्याविरुद्ध अपील करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व संदीप मेहता यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय गुणवत्तापूर्ण असल्याचे सांगितले.

इतर आरोपी कोण?

साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून, तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. इतर आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (मुरेवाडा, जि. गडचिरोली), हेम केशवदत्ता मिश्रा (कुंजबारगल, जि. अलमोडा, उत्तराखंड), प्रशांत राही नारायण सांगलीकर ( डेहराडून, उत्तराखंड), विजय नान तिरकी ( धरमपूर, जि. कांकेर छत्तीसगड) व पांडू पोरा नरोटे यांचा समावेश आहे. नरोटे (रा. मुरेवाडा) याचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले आहे. 

‘मंजुऱ्या कायदेशीर नाहीत’

गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी या आरोपींना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेचे सदस्य असणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य इत्यादी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली होती. 

सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला होता. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर झाले.

आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई करताना बंधनकारक तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. आरोपींविरुद्ध खटला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या मंजुऱ्या कायदेशीर नाहीत, असे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय