शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सर्वोच्च न्यायालय, राजघाट परिसरही जलयम; पंतप्रधान मोदींचा फान्समधून अमित शाह यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 12:10 IST

मुसळधार पाऊस आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाजवळ पाणी साचल्याचे दिसून आले. 

नवी दिल्ली: यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी संकट कायम आहे. मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. नदीचा प्रवाह कायम आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक भागात बिकट परिस्थिती झाली आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

मुसळधार पाऊस आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाजवळ पाणी साचल्याचे दिसून आले. तसेच राजघाटाजवळ पाणी साचले आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह सार्वजनिक आणि खासगी पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. नदीजवळ राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात 'मुसळधार पाऊस' होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील परिस्थितीबाबत माहिती घेतली. नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील पूरस्थितीबद्दल चर्चा केली. अमित शाहा यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. यमुना नदीची पाणी पातळी कमी होण्याचा अंदाज असल्याचे अमित शाह यांनी नरेंद्र मोदींना सांगितले. तसेच परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्याचेही शाह म्हणाले

दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, यमुनेच्या पाण्याची पातळी शुक्रवारपर्यंत ओसरू लागेल, असा दिलासा देणारा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे. भारतातील  ७२ टक्के जिल्ह्यांना पुराचा गंभीर फटका बसला असून, त्यापैकी केवळ २५ टक्के जिल्ह्यांमध्ये पूर अंदाज केंद्रे किंवा पूर्व चेतावणी प्रणाली असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत कमी पूर अंदाज केंद्रे आहेत. त्यामुळे पर्यटकांना माहिती मिळण्यात अडचण आली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRainपाऊसfloodपूरdelhiदिल्लीAmit Shahअमित शाह