शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पराली न जाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला 100 रुपये द्या- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 19:48 IST

शेतातील कडपा म्हणजेच पराली जाळू नये, यासाठी शेतकऱ्यांना 100 रुपये प्रतिक्विंटलच्या हिशेबानं सरकारनं प्रोत्साहन भत्ता द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

नवी दिल्लीः शेतातील कडपा म्हणजेच पराली जाळू नये, यासाठी शेतकऱ्यांना 100 रुपये प्रतिक्विंटलच्या हिशेबानं सरकारनं प्रोत्साहन भत्ता द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. पराली न जाळण्याच्या बदल्यात तिन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा. या आदेशामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. हा निर्णय छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना लक्षात ठेवून घेण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधले शेतकरी शेतातील पराली जाळत असल्यानंच दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचं समोर आलेलं आहे. परंतु हा आदेश बासमती तांदळाच्या शेतीतून उत्पन्न होणाऱ्या परालीवर लागू होणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला कोणतंही शुल्क वसूल न करता छोटे आणि सीमान्त शेतकऱ्यांना परालीची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांनाही फटकारलं आहे. निधीच्या कमतरतेचं कारण देत सरकारनं स्वतःची जबाबदारी निभावण्यास टाळाटाळ करू नये. कृषी क्षेत्र हा भारताच्या पाठीचा कणा आहे. भारतातल्या छोट्या आणि सीमान्त शेतकऱ्यांच्या हितांचं संरक्षण झालं पाहिजे. निधी उपलब्ध नसल्याचं कारण देत याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्लाही न्यायालयानं या सरकारांना दिला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय