शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:34 IST

संविधानात दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय आपल्याला खरोखर समजतो का? कदाचित नाही अशी नाराजी न्यायाधीशांनी व्यक्त केली

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथे ना कार जाते, ना बाईक..आजही पर्यटकांना हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षातून हिल स्टेशनला नेले जाते. डोंगराळ भागात खेचत एका व्यक्तीला दुसरा व्यक्ती घेऊन जातो. हा फोटो जुन्या जमान्यातला नाही तर आजचा आहे. सुप्रीम कोर्टाने यावर कडक ताशेरे ओढले.

बुधवारी सुप्रीम कोर्टासमोर हे प्रकरण आले. त्यात सरन्यायाधीश भूषण गवई आणि दोन अन्य न्यायाधीशांच्या पीठाने त्यावर नाराजी व्यक्त केली. कोर्टाने म्हटलं की,  आजही आपल्या देशात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला रिक्षातून हाताने ओढत नेतो हे खूप खेदाचे आहे. आपले संविधान प्रत्येक नागरिकाला आदर आणि समानतेचा अधिकार देते, तेव्हा असे कसे घडू शकते? संविधानात दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय आपल्याला खरोखर समजतो का? कदाचित नाही अशी नाराजी न्यायाधीशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने ४५ वर्षांपूर्वी स्पष्ट आदेश दिले होते.

महाराष्ट्र सरकारला दिले निर्देश

माथेरान इथल्या हातगाडी रिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिलेत. आता आणखी उशीर करू नये. सरकारने पुढच्या ६ महिन्यात पर्यायी व्यवस्था उभी करावी. ज्यात हात रिक्षा चालवणाऱ्यांना ई-रिक्षा देण्याची व्यवस्था असावी किंवा सरकारने स्वत: ई रिक्षा खरेदी करून त्या लोकांना चालवायला द्यावी. त्या लोकांचा उदरनिर्वाह चालायला हवा. त्यांनाही सन्मानाने जीवन जगता यायला हवे असं कोर्टाने म्हटलं. 

४५ वर्षापूर्वी आदेश, तरीही सुधारणा नाही

माथेरानच्या सुनावणीत कोर्टाने ४५ वर्षापूर्वीच्या खटल्याचा दाखला दिला. त्यात पंजाब येथील सायकल रिक्षाचालकांवर मोठा निर्णय घेण्यात आला होता. रिक्षा चालकांना चांगले आयुष्य मिळायला हवे, त्यांचे शोषण होऊ नये. परंतु इतक्या वर्षांनीही माथेरानसारख्या भागात परिस्थिती बदलली नाही. आजही तिथे लोक हाताने रिक्षा खेचतात, जसे गुलामगिरीच्या काळात सुरू होते. ही गोष्ट केवळ रिक्षा चालवण्याची नाही तर समाजाची मानसिकता बदलण्याची आहे. जर आजही आपण अशाप्रकारे काम करण्यास कुणाला मजबूर करत असू तर आपल्या संविधानाच्या मूळ गाभ्याचा विश्वासघात केल्यासारखे आहे. ज्यात प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. या अमानवी प्रथा बंद संपायला हव्यात. आपण भारतातील लोक आहोत, जिथे सर्वांना समान अधिकार आहे असं कोर्टाने म्हटलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMatheranमाथेरान