शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:34 IST

संविधानात दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय आपल्याला खरोखर समजतो का? कदाचित नाही अशी नाराजी न्यायाधीशांनी व्यक्त केली

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथे ना कार जाते, ना बाईक..आजही पर्यटकांना हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षातून हिल स्टेशनला नेले जाते. डोंगराळ भागात खेचत एका व्यक्तीला दुसरा व्यक्ती घेऊन जातो. हा फोटो जुन्या जमान्यातला नाही तर आजचा आहे. सुप्रीम कोर्टाने यावर कडक ताशेरे ओढले.

बुधवारी सुप्रीम कोर्टासमोर हे प्रकरण आले. त्यात सरन्यायाधीश भूषण गवई आणि दोन अन्य न्यायाधीशांच्या पीठाने त्यावर नाराजी व्यक्त केली. कोर्टाने म्हटलं की,  आजही आपल्या देशात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला रिक्षातून हाताने ओढत नेतो हे खूप खेदाचे आहे. आपले संविधान प्रत्येक नागरिकाला आदर आणि समानतेचा अधिकार देते, तेव्हा असे कसे घडू शकते? संविधानात दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय आपल्याला खरोखर समजतो का? कदाचित नाही अशी नाराजी न्यायाधीशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने ४५ वर्षांपूर्वी स्पष्ट आदेश दिले होते.

महाराष्ट्र सरकारला दिले निर्देश

माथेरान इथल्या हातगाडी रिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला निर्देश दिलेत. आता आणखी उशीर करू नये. सरकारने पुढच्या ६ महिन्यात पर्यायी व्यवस्था उभी करावी. ज्यात हात रिक्षा चालवणाऱ्यांना ई-रिक्षा देण्याची व्यवस्था असावी किंवा सरकारने स्वत: ई रिक्षा खरेदी करून त्या लोकांना चालवायला द्यावी. त्या लोकांचा उदरनिर्वाह चालायला हवा. त्यांनाही सन्मानाने जीवन जगता यायला हवे असं कोर्टाने म्हटलं. 

४५ वर्षापूर्वी आदेश, तरीही सुधारणा नाही

माथेरानच्या सुनावणीत कोर्टाने ४५ वर्षापूर्वीच्या खटल्याचा दाखला दिला. त्यात पंजाब येथील सायकल रिक्षाचालकांवर मोठा निर्णय घेण्यात आला होता. रिक्षा चालकांना चांगले आयुष्य मिळायला हवे, त्यांचे शोषण होऊ नये. परंतु इतक्या वर्षांनीही माथेरानसारख्या भागात परिस्थिती बदलली नाही. आजही तिथे लोक हाताने रिक्षा खेचतात, जसे गुलामगिरीच्या काळात सुरू होते. ही गोष्ट केवळ रिक्षा चालवण्याची नाही तर समाजाची मानसिकता बदलण्याची आहे. जर आजही आपण अशाप्रकारे काम करण्यास कुणाला मजबूर करत असू तर आपल्या संविधानाच्या मूळ गाभ्याचा विश्वासघात केल्यासारखे आहे. ज्यात प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. या अमानवी प्रथा बंद संपायला हव्यात. आपण भारतातील लोक आहोत, जिथे सर्वांना समान अधिकार आहे असं कोर्टाने म्हटलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMatheranमाथेरान