शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

सिंगूरची जमीन शेतक-यांना परत करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: August 31, 2016 16:35 IST

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सिंगूरची जमीन आपल्या ताब्यात घेऊन 12 आठवड्यांच्या आत शेतक-यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - बंगालच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरलेल्या सिंगूर जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सिंगूरची जमीन आपल्या ताब्यात घेऊन 12 आठवड्यांच्या आत शेतक-यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. 2006 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने टाटा मोटर्स नॅनो प्लांट उभारण्यासाठी ही जमीन खरेदी केली होती. ज्या शेतक-यांना या जमिनीचा मोबदला मिळाला आहे त्यांना तो परत करण्याची गरज नाही, कारण ते गेल्या एका दशकापासून जमिनीसाठी लढा देत आहेत असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावल्यानंतर गावक-यांनी आनंद साजरा करत जल्लोष केला. सिंगूरच्या या जमिनीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं होतं. 2008 मध्ये टाटाने नॅनो प्लांट गुजरातमध्ये नेला होता. सिंगूरची जमीन ताब्यात घेण्याच्या विरोधात शेतक-यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. सध्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा ममता बॅनर्जी विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या.
न्यायालयाने डाव्यांचं सरकार आणि टाटा मोटर्समध्ये झालेला करार बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. सिंगूरमधील शेतक-यांची जमीन चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली. जमीन घेण्याची सर्व प्रक्रिया आश्चर्यकारक असून डोळ्यात धूळ फेकणार आहे असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. नॅनो प्लांट उभा करण्यासाठी टाटा मोटर्सला एक हजार एकर जमीन उपलब्ध करुन देण्यात आली होती, सर्वोच्च न्यायालयाने हा करार रद्द केला आहे.
 
कोलकाता उच्च न्यायालयाने या कराराला मान्यता दिली होती, मात्र विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. जमीन परत करण्याऐवजी सिंगूरमध्ये दुसरा प्रोजेक्ट उभारण्यासाठी तयार असल्याचं टाटाने न्यायालयात सांगितलं होतं. 
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताच स्थानिक शेतक-यांनी जल्लोष करत ममता बॅनर्जींच्या नावे घोषणा देण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये झालेल्या या करारामुळे डाव्याचं सरकार सत्तेतून खाली उतरलं होतं. आणि याच जमिनीच्या आंदोलनाच्या पाठबळावर ममता बॅनर्जींचं सरकार सत्तेवर आलं.