शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सिंगूरची जमीन शेतक-यांना परत करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: August 31, 2016 16:35 IST

सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सिंगूरची जमीन आपल्या ताब्यात घेऊन 12 आठवड्यांच्या आत शेतक-यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - बंगालच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा ठरलेल्या सिंगूर जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला सिंगूरची जमीन आपल्या ताब्यात घेऊन 12 आठवड्यांच्या आत शेतक-यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. 2006 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने टाटा मोटर्स नॅनो प्लांट उभारण्यासाठी ही जमीन खरेदी केली होती. ज्या शेतक-यांना या जमिनीचा मोबदला मिळाला आहे त्यांना तो परत करण्याची गरज नाही, कारण ते गेल्या एका दशकापासून जमिनीसाठी लढा देत आहेत असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावल्यानंतर गावक-यांनी आनंद साजरा करत जल्लोष केला. सिंगूरच्या या जमिनीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं होतं. 2008 मध्ये टाटाने नॅनो प्लांट गुजरातमध्ये नेला होता. सिंगूरची जमीन ताब्यात घेण्याच्या विरोधात शेतक-यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. सध्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा ममता बॅनर्जी विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या.
न्यायालयाने डाव्यांचं सरकार आणि टाटा मोटर्समध्ये झालेला करार बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. सिंगूरमधील शेतक-यांची जमीन चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली. जमीन घेण्याची सर्व प्रक्रिया आश्चर्यकारक असून डोळ्यात धूळ फेकणार आहे असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. नॅनो प्लांट उभा करण्यासाठी टाटा मोटर्सला एक हजार एकर जमीन उपलब्ध करुन देण्यात आली होती, सर्वोच्च न्यायालयाने हा करार रद्द केला आहे.
 
कोलकाता उच्च न्यायालयाने या कराराला मान्यता दिली होती, मात्र विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. जमीन परत करण्याऐवजी सिंगूरमध्ये दुसरा प्रोजेक्ट उभारण्यासाठी तयार असल्याचं टाटाने न्यायालयात सांगितलं होतं. 
सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताच स्थानिक शेतक-यांनी जल्लोष करत ममता बॅनर्जींच्या नावे घोषणा देण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये झालेल्या या करारामुळे डाव्याचं सरकार सत्तेतून खाली उतरलं होतं. आणि याच जमिनीच्या आंदोलनाच्या पाठबळावर ममता बॅनर्जींचं सरकार सत्तेवर आलं.