शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गोरक्षकांना आवरा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 04:18 IST

गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत, सर्वोच्च न्यायालयाने गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची नेमणूक करावी, असे आदेश दिले.

नवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत, सर्वोच्च न्यायालयाने गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची नेमणूक करावी, असे आदेश दिले.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अमिताभ रॉय व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी काय पावले उचलली, याचा तपशील सादर करावा, असेही निर्देश राज्यांना दिले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हरयाणाने ही सूचना मान्य करून, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी ‘नोडल आॅफिसर’ म्हणून नेमण्याची तयारी दर्शविली.उपद्रव थांबविण्यासाठी काय केले?जनावरांची वाहतूक करणाºयांना अडवून गोरक्षकांकडून हिंसाचार केला जातो, हे लक्षात घेता, महामार्गांवरील हा उपद्रव थांबविण्यासाठी काय केले जाऊ शकेल, याचीही माहिती मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून सादर करावी, असेही न्यायालयाने सांगितले.काँग्रेस कार्यकर्त्या तहसीन पूनावाला व इतरांनी केलेल्या याचिकांच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आधीपासून आहेच. त्यात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. केंद्र सरकारने गोरक्षणाच्या नावाखाली होणारा हिंसाचार सर्वस्वी अमान्य आहे.पण हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने तो राज्य सरकारांनी हाताळायचा विषय आहे, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा ‘तुम्हाला हिंसाचार रोखावाच लागेल’, असे सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितले. या मुद्द्यावर केंद्रास भूमिका स्पष्ट करण्यास सांगून, पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय