शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

गोरक्षकांना आवरा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 04:18 IST

गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत, सर्वोच्च न्यायालयाने गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची नेमणूक करावी, असे आदेश दिले.

नवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हाती घेऊ दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत, सर्वोच्च न्यायालयाने गोरक्षकांकडून होणा-या हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी सर्व राज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिका-याची नेमणूक करावी, असे आदेश दिले.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अमिताभ रॉय व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी काय पावले उचलली, याचा तपशील सादर करावा, असेही निर्देश राज्यांना दिले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हरयाणाने ही सूचना मान्य करून, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी ‘नोडल आॅफिसर’ म्हणून नेमण्याची तयारी दर्शविली.उपद्रव थांबविण्यासाठी काय केले?जनावरांची वाहतूक करणाºयांना अडवून गोरक्षकांकडून हिंसाचार केला जातो, हे लक्षात घेता, महामार्गांवरील हा उपद्रव थांबविण्यासाठी काय केले जाऊ शकेल, याचीही माहिती मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा करून सादर करावी, असेही न्यायालयाने सांगितले.काँग्रेस कार्यकर्त्या तहसीन पूनावाला व इतरांनी केलेल्या याचिकांच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आधीपासून आहेच. त्यात सहभागी होण्यासाठी महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. केंद्र सरकारने गोरक्षणाच्या नावाखाली होणारा हिंसाचार सर्वस्वी अमान्य आहे.पण हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने तो राज्य सरकारांनी हाताळायचा विषय आहे, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा ‘तुम्हाला हिंसाचार रोखावाच लागेल’, असे सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितले. या मुद्द्यावर केंद्रास भूमिका स्पष्ट करण्यास सांगून, पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय