शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:15 IST

Supreme Court judgements Waqf Amendment Act 2025: केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ कायद्याविरोधात अनेक विरोधीपक्ष आणि मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Supreme Court on Waqf Amendment Act 2025: लोकसभा आणि राज्यसभेत पास झाल्यानंतर वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. त्यानंतर आता देशात वक्फ कायदा लागू झाला आहे. पण, आता या कायद्याच्या वैधानिकतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांच्यासह किमान दहा व्यक्ती किंवा संघटनांनी या कायद्याविरोधात देशातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिका दाखल करणाऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद असा आहे की, हा कायदा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांचे उल्लंघन आणि मुस्लिमांचे मूलभूत आणि धार्मिक अधिकार हिरावून घेण्याचे षडयंत्र आहे. याचिकाकर्ते पुन्हा पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या टिप्पणीचा पुनरुच्चार करत आहेत, ज्यात एससीने म्हटले होते- 'एकदा वक्फ झाले की, विषय संपला.' दरम्यान, वक्फबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले तीन निर्णय महत्त्वाचे आहेत.

पहिला – रतीलाल पानचंद गांधी विरुद्ध द स्टेट ऑफ बॉम्बे (1954)

1954 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय देशातील धार्मिक स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित करणारा होता. या निर्णयात न्यायालयाने 1950 च्या बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यातील काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या होत्या. धर्मनिरपेक्ष संस्थेला धार्मिक मालमत्तेचे नियंत्रण देणे, हे त्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या धार्मिक आणि मालमत्ता अधिकारांवर अतिक्रमण आहे, असे न्यायालयाने तेव्हा म्हटले होते. हा निर्णय आधार मानून वक्फ मालमत्तेवर सरकारचे नियंत्रण वाढवणे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर तपासाची व्यवस्था करणे, हे 1954 च्या या निर्णयाचे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला जात आहे.

दुसरा - सय्यद अली विरुद्ध आंध्र प्रदेश वक्फ बोर्ड हैदराबाद (1998)

1998 च्या या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने वक्फला इस्लाम धर्माअंतर्गत धर्मादाय करण्याची पद्धत मानली होती. ही व्यवस्था कुराणातून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. या निर्णयात न्यायालयाने वक्फचा वारसा मान्य केला होता. मुस्लीम कायद्यांमध्ये वक्फ हे पवित्र आणि धार्मिक स्वरूपाचे दान असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाने वक्फ कायमस्वरुपी मानला होता. वक्फ संपत्ती घोषित झाल्यानंतर ती वक्फच राहील, असे न्यायालयाने तेव्हा म्हटले होते.

तिसरा - के. नागराज विरुद्ध आंध्र प्रदेश (1985)

ही बाब आंध्र प्रदेश सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयाशी संबंधित होती. त्याचा थेट वक्फशी संबंध नव्हता, पण त्याचा आधार नक्कीच बनवला जात होता. मूळ कायद्याचा उद्देश निष्प्रभ ठरणाऱ्या अशा कोणत्याही सुधारणा घटनाबाह्य मानल्या जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयात म्हटले होते. आता न्यायालयात असा युक्तिवाद केला जात आहे की, नवीन कायद्यातील किमान 35 दुरुस्त्या 1995 च्या वक्फ कायद्यातील तरतुदींच्या वास्तविक उद्देशाचे उल्लंघन करत आहेत.

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय