शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आशेचा किरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 09:57 IST

जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी आशा, प्रगती व एकतेचा जाहीरनामाच : मोदी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसंदर्भातील राज्यघटनेत असलेले ३७० कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. हा केवळ न्यायालयीन निकाल नाही, तर आशेचा किरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

मोदी म्हणाले की, ३७० कलमाबाबत कोर्टाने दिलेला निकाल मजबूत आणि अखंड भारत निर्माण करण्याच्या सामूहिक संकल्पाचे दर्शन घडवितो. हा निकाल म्हणजे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आशा, प्रगती आणि एकतेचा जाहीरनामाच आहे. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. केवळ त्यांनाच प्रगतीची फळे चाखायला मिळणार असे नसून कलम ३७०मुळे समाजातील ज्या वंचित, दुर्बल घटकांचे नुकसान झाले त्यांच्यापर्यंतही प्रगतीचे फायदे केंद्र सरकार पोहोचविणार आहे.

 कलम ३७० च्या बाजूने

‘३७० व ३७ अ’ कलम रद्द करण्याचा  निर्णय राज्यघटनेच्या दृष्टीने वैध आहे, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे प्रत्येक भारतीयांना आनंद झाला आहे. ३७० कलम रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एक नवा अध्याय लिहिला नाही तर आपल्या देशाची अखंडता आणखी मजबूत केली. -राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री

हा राष्ट्रवादी लोकांना आनंद साजरा करण्यासाठी लाभलेला आणखी एक उत्तम क्षण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राजवटीत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देऊन काँग्रेसने घोडचूक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे ३७० कलम रद्द करून हा विशेष दर्जा रद्द केला.-अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री

 कलम ३७० च्या विरोधात 

हा निकाल फाशीची शिक्षा दिल्यासारखेच आहे. १९४७ साली मुस्लीमबहुल राज्याने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ठरविण्यात आलेल्या गोष्टींचा या निकालामुळे पाडाव झाला आहे. संसदेमध्ये करण्यात आलेल्या अवैध कृतीला वैध ठरविण्यात आले आहे. 

-मेहबुबा मुफ्ती, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख

निकालामुळे मी निराश झालो; पण निरुत्साही नाही. आम्ही प्रदीर्घ कालावधीच्या लढाईसाठी सज्ज आहोत. आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहील. ‘दिल ना उमेद तो नही, नाकाम ही तो है, लंब है गम की शाम, मगर शाम ही तो है’ हा फैज अहमद फैज यांनी लिहिलेला शेर आमच्या मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करतो. -ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्षहा निकाल दुर्दैवी आहे. हा निकाल प्रत्येकाला जड अंत:करणाने स्वीकारावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देईल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या भावनांचा सर्वोच्च न्यायालय विचार करेल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, तसे काही घडले नाही. 

-गुलाम नबी आझाद, डेमोक्रॅटिक आझाद पार्टीचे अध्यक्ष

पाकिस्तान म्हणते... 

३७० कलम रद्द करण्याचा निर्णय वैध आहे या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला कायदेशीर मूल्य नाही. ३७० कलम रद्द करण्याचा भारतातील केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी