शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

'त्या' 50 कोटी मोबाईल नंबरला मिळाला 'आधार'; सेवा अखंडितपणे सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:39 IST

50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार नाही

नवी दिल्ली: आधार क्रमांक देऊन सिम कार्ड घेतलेल्या ग्राहकांची सेवा खंडित केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डबद्दल दिलेल्या निकालामुळे 50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार असल्याचं वृत्त होतं. त्यामुळे कोट्यवधी मोबाईल ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्ध केलं. आधार कार्ड देऊन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची सेवा तशीच सुरू राहील, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं. देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना मोबाईल कंपन्यांना आधार क्रमांक दिला आहे. मात्र खासगी कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली, त्यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. या ग्राहकांची सेवा बंद केली जाऊ शकते, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं होतं. मात्र आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या 50 कोटी ग्राहकांची सेवा अखंडितपणे सुरू होईल, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं दिलं. आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेले ग्राहक पुन्हा एकदा केवायसी पडताळणी करुन घेऊ शकतात, असं दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं निवेदनातून स्पष्ट केलं. मात्र ही पडताळणी करायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असेल. पडताळणीचा हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचा असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली आहे, त्यांची सेवा खंडित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला नाही, ही महत्त्वाची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल