शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' 50 कोटी मोबाईल नंबरला मिळाला 'आधार'; सेवा अखंडितपणे सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:39 IST

50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार नाही

नवी दिल्ली: आधार क्रमांक देऊन सिम कार्ड घेतलेल्या ग्राहकांची सेवा खंडित केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डबद्दल दिलेल्या निकालामुळे 50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार असल्याचं वृत्त होतं. त्यामुळे कोट्यवधी मोबाईल ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्ध केलं. आधार कार्ड देऊन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची सेवा तशीच सुरू राहील, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं. देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना मोबाईल कंपन्यांना आधार क्रमांक दिला आहे. मात्र खासगी कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली, त्यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. या ग्राहकांची सेवा बंद केली जाऊ शकते, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं होतं. मात्र आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या 50 कोटी ग्राहकांची सेवा अखंडितपणे सुरू होईल, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं दिलं. आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेले ग्राहक पुन्हा एकदा केवायसी पडताळणी करुन घेऊ शकतात, असं दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं निवेदनातून स्पष्ट केलं. मात्र ही पडताळणी करायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असेल. पडताळणीचा हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचा असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली आहे, त्यांची सेवा खंडित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला नाही, ही महत्त्वाची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल