शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

'त्या' 50 कोटी मोबाईल नंबरला मिळाला 'आधार'; सेवा अखंडितपणे सुरुच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:39 IST

50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार नाही

नवी दिल्ली: आधार क्रमांक देऊन सिम कार्ड घेतलेल्या ग्राहकांची सेवा खंडित केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आधार कार्डबद्दल दिलेल्या निकालामुळे 50 कोटी मोबाईल नंबरवरील सेवा खंडित होणार असल्याचं वृत्त होतं. त्यामुळे कोट्यवधी मोबाईल ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरण यांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्ध केलं. आधार कार्ड देऊन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची सेवा तशीच सुरू राहील, असं या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं. देशातील कोट्यवधी ग्राहकांनी सिम कार्ड घेताना मोबाईल कंपन्यांना आधार क्रमांक दिला आहे. मात्र खासगी कंपन्यांना आधार कार्ड क्रमांक देण्याची गरज नसल्याचा निकाल काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यामुळे ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली, त्यांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. या ग्राहकांची सेवा बंद केली जाऊ शकते, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं होतं. मात्र आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेल्या 50 कोटी ग्राहकांची सेवा अखंडितपणे सुरू होईल, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं दिलं. आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतलेले ग्राहक पुन्हा एकदा केवायसी पडताळणी करुन घेऊ शकतात, असं दूरसंचार विभाग आणि आधार प्राधिकरणानं निवेदनातून स्पष्ट केलं. मात्र ही पडताळणी करायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असेल. पडताळणीचा हा निर्णय पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाचा असेल, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ज्यांनी आधार कार्ड क्रमांक देऊन मोबाईल सेवा घेतली आहे, त्यांची सेवा खंडित करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला नाही, ही महत्त्वाची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल